शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

अवकाळी पावसाने रबी हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देमदतीची मागणी : लाखांदूर तालुक्याला जबर फटका, शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अवकाळी पावसाने तालुक्यातील रबी पीक संकटात आली असून होळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, लाखोरी पिकांची काढणी सुरू असतानाच झालेल्सर जोरदार पावसाने पीक उध्वस्त झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवार करून पिकांची पेरणी केली होती. मात्र रबी हंगामात अनेकदा झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजावर संकट सापडले आहे.शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि त्यानंतर रबी हंगामातील दोन ते तीनवेळा झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतात पीके चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक विम्यातून भरीव मदत देण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी धान पिकाचे उत्पादन चांगले झाले. मात्र त्याची विक्री करताना शेतकºयांना अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागला. आजही अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी टोकन मिळाले असतानाही खरेदी केंद्रांवर धान विक्री होत नाही. एकीकडे टोकन देवून शेतकºयांना दिलासा दिला जातो. तर दुसरीकडे महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावरील समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेवून धान खरेदी केंद्रावरील समस्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही.

टॅग्स :Rainपाऊस