शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रबी हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.

ठळक मुद्देमदतीची मागणी : लाखांदूर तालुक्याला जबर फटका, शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अवकाळी पावसाने तालुक्यातील रबी पीक संकटात आली असून होळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, लाखोरी पिकांची काढणी सुरू असतानाच झालेल्सर जोरदार पावसाने पीक उध्वस्त झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवार करून पिकांची पेरणी केली होती. मात्र रबी हंगामात अनेकदा झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजावर संकट सापडले आहे.शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि त्यानंतर रबी हंगामातील दोन ते तीनवेळा झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतात पीके चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक विम्यातून भरीव मदत देण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी धान पिकाचे उत्पादन चांगले झाले. मात्र त्याची विक्री करताना शेतकºयांना अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागला. आजही अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी टोकन मिळाले असतानाही खरेदी केंद्रांवर धान विक्री होत नाही. एकीकडे टोकन देवून शेतकºयांना दिलासा दिला जातो. तर दुसरीकडे महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावरील समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेवून धान खरेदी केंद्रावरील समस्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही.

टॅग्स :Rainपाऊस