अवकाळी पावसाने रबी उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. ...

अवकाळी पावसाने रबी उत्पादनात घट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
तालुक्यातील खमारी, आंबाडी, भिलेवाडा, पिंडकेपार, सालेबर्डी, गुंथारा, धारगाव, करचखेडा, सिंगोरी, पलाडी, आमगाव, उसरागोंदी, टेकेपार डोडमाझरी, दिघोरी आदी परिसरातील पिकांचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
खरीप हंगामातील परतीच्या पावसाचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी सातत्याने संकटात सापडलेला बळीराजा अद्यापही बाहेर निघू शकला नाही. अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाख्याने जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी हंगामातील पीकांची काढणीची लगबग सुरु असतानाच अवकाळीच्या तडाख्याने पीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे रबी पिकांच्या उत्पादनात सुमारे ७० टक्के घट झाली असल्याची माहिती आहे.
शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावर्षी सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. गत आठवड्याभरापासून अनेकवेळा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने यात आणखीच भर पडली आहे.
सततच्या पावसाने शेतकरी त्रस्त
लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांसह गहू, हरभरा पीके संकटात सापडली आहे. अनेक ठिकाणी गहे काळवंडला असून कापणी केलेल्या रबी पिकांचा कडपा भिजल्याने शेतकरी धास्तावले आहे. एकाच आठवड्यात दोनदा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कायम राहणार आहे.