शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकाला व्यापाऱ्यांकरवी अल्प भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:42 IST

चौरास भागात यावर्षी प्रचंड प्रमाणात चन्याचे उत्पादन झाले. दरवर्षी चौरास भागात चन्याचे क्षेत्र वाढत आहे. अशावेळी या भागात शासकीय हमीभाव केंद्र नसल्याने शेतकºयांना खासगी व्यापाºयांना अत्यल्प दरात चना विकावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची होतेय लुबाडणूक : शासकीय हमीभाव केंद्र नसल्याचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : चौरास भागात यावर्षी प्रचंड प्रमाणात चन्याचे उत्पादन झाले. दरवर्षी चौरास भागात चन्याचे क्षेत्र वाढत आहे. अशावेळी या भागात शासकीय हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात चना विकावा लागत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचा चणा कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी, उपबाजार कोंढा, आसगाव चौ.येथे पडून असून त्यास बोली लावण्यास व्यापारी मागेपुढे पाहत आहेत.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, शासनाने चना खरेदी केंद्र कोंढा, आसगाव यापैकी एका ठिकाणी सुरू करावे, पण याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. चौरास भागात रबी पीक म्हणून शेतकरी चन्यास पसंती देत आहे.कोरडवाहू, सिंचन सुविधा असलेले शेतकरी हे पीक घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज देखिल या भागात चना घरोघरी पडून असल्याचे चित्र दिसेल. शासकीय चन्याचे हमीभाव ४१०० रूपये जाहीर झाले. सध्या कोंढा येथील व्यापाऱ्यांनी ३४०० पर्यंत चना खरेदी केले. सध्या तर ३२०० देखिल भाव देण्यास व्यापारी तयार नाहीत. मराठवाड्यात हमीभावापेक्षा जास्त सहा हजार, सात हजार चन्यास भाव मिळाला. अमरावतीत चार हजार ते ४१०० पर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला.नागपूर विभागात सर्वात कमी ३४०० ते ३२०० चन्यास मिळत आहे. हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. मराठवाडा व अमरावतीमध्ये चांगले भाव मिळत असताना नागपूर विभागात ते भाव का कमी मिळत आहे? याचा शोध घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने चना विकावा लागतो याचा शोध घेऊन यास जबाबदार कोण त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.चौरास भागात काही मोठे व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात बोली बोलतात व दलालांमार्फत चना, तूर, लाखोरी, वाटाणा खरेदी करीत असतात. त्या मोठ्या व्यापाऱ्यांचे डायरेक्ट संबंध दालमित्र व फास्टफुड कंपन्यासी आहेत ते व्यापारी चौरास भागात अत्यल्प दरात रबी पिक खरेदी करून कंपनी व दालमिलला पुरवठा करून प्रचंड नफा कमवित आहेत. अशावेळी हमीभाव पेक्षा कमी दरात चना, तूर, लाखोरी खरेदी करणाºयावर कारवाई करण्याचे अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला आहेत. त्यांचे परवाने रद्द करू शकते. पण ती हिम्मत कृषी उत्पन्न बाजार समिती दाखवत नाही. याचा फायदा व्यापारी घेत आहेत. गावात व्यापाऱ्यांचे दलाल फिरून अत्यल्प दरात चना, वाटाणा, लाखोरी, तूर खरेदी करतात. त्यामध्ये माल मोजताना वजनकाट्यात शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे, अशी सगळीकडून शेतकऱ्यांची लूट चौरास भागात सुरू आहे.शेतकºयांचा माल निघाला की भाव पडले म्हणून व्यापारी ओरड करतात. त्यानंतर कमी किंमतीत माल खरेदी करायचे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. शेतातील चना, लाखोरी, वाटाणा, तूर, मळणी होऊन साहित्य घरी, उपबाजारात विकण्यासाठी ठेवला आहे. मालाची उचल नाही म्हणून उलट कमी भावाने खरेदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कोंढा येथे उपबाजारात कार्यरत काही दलाल देखिल स्वत:च माल खरेदी करून दालमिल कंपनीला मालाचा पुरवठत्त करीत असतात. ते देखिल हमीभावापेक्षा कमी भावाने चना, तूर खरेदी करीत आहेत. तेव्हा अशा व्यक्तीवर कारवाई होणे आवश्यक आहे.यासाठी शेतकऱ्यांच्या समस्येवर एकच तोडगा होता तो म्हणजे चौरास भागात शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाले पाहिजे. तरच शेतकऱ्यांना चन्याला चांगला भाव मिळू शकेल. परंतू याकडे अधिकारी, पालकमंत्री लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाºयास माल द्यायचे नाही, योग्य भाव मिळाल्याशिवाय चना, तूर, वटाणा, लाखोरी, मसूर, धने आदी पिकांची विक्री करणार नाही, असे ठरविणे आवश्यक आहे. चौरास भागातील शेतकरी संघटीत नसल्याने हा सर्व अन्याय शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. नागपूर विभागात, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांना खरीप, रब्बी हंगामात योग्य भाव मिळताना दिसत नाही. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात चौरास भाग म्हणून कोंढा, आसगाव परिसरात प्रचंड प्रमाणात चना उत्पादन झाले पण भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.