शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:00 AM

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : खरीपानंतर शेतकरी पुन्हा संकटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गत तीन दिवसांपासून तर सारखा अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते.जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, मुग उडीद, सोयाबीन, जवस पोपट, भाजीपाला, भूईमुग, ऊस, मसूर, मोहरी, मिरची आदी पिकांची लागवड करीत असतात.यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या आशेने शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला.तथापि जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकºयांनी भर दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.रबी पिके सुरुवातीला जोमात असताना शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन-तीनदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने रबी पिके संकटात सापडली आहेत.कृषी विभागाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षखरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात. रबी पिकांवर वातावरणाचा फटका बसत असून उत्पादनात कमालीची वाढ होण्याची शक्यताही कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपाययोजना शून्य असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.रात्रभर बरसला पाऊसभंडारा शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाऊस बरसत होता. दिवसभर ढगाळी वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली

टॅग्स :agricultureशेती