शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

देव्हाडी उड्डाणपुलावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:12 IST

देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. निरीक्षणादरम्यान ग्रामस्थांचे शिष्टमंडळानी भेट घेऊन चर्चा केली. परंतु केवळ आश्वासन देण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आयुक्तांना पुराव्यानिशी तक्रार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुल बांधकामात अनियमितता असून पुलाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उद्घाटनापूर्वीच पुलावर मोठे भगदाड व खड्डे पडणे सुरुच आहे. त्याविरोधात देव्हाडी येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार दिली. सदर पुल बांधकामाची नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.देव्हाडी येथे गत चार वर्षापासून दगडी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला. पावसाळ्यात पुलातून राख वाहून गेल्यावर मोठे भगदाड पडले आहे. इतर खड्डेही पडणे सुरुच आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. निरीक्षणादरम्यान ग्रामस्थांचे शिष्टमंडळानी भेट घेऊन चर्चा केली. परंतु केवळ आश्वासन देण्यात आली. प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. केवळ थातूरमातूर खड्डे भरण्यात आली आहैेत. भविष्यात येथे मोठ्या अपघाताची शक्यता अधिक आहे.राष्ट्रीय महामार्ग आल्याने उड्डाणपुलावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. राख वाहून गेल्याने सदर पुल आतून पोकळ झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सदर पुलाची चौकश्ी संदर्भात थेट मंत्रालयात तक्रार केली. परंतु त्याची साधी चौकशी झाली नाही. येथे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विवभागासोबतच प्रशासनाची राहील असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे २४ कोटींचा हा महत्वाकांक्षी उड्डाणपुल आहे. पुराव्यानिशी तक्रार व माध्यमांनी येथे ध्यानाकर्षण केल्यानंतरही येथे कारवाई न झाल्याचे एकच कोडेच आहे.विभागीय आयुक्तांना पुरावे सादर करणारस्थानिक प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने विभागीय आयुक्तांना नागपूर येथे भेटून पुलाची चित्रफित पुरावे म्हणून सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते खुशाल नागपुरे, स्टेशन टोलीचे माजी सरपंच श्याम नागपुरे, श्यामसुंदर नागपुरे, योगेश गभणे, प्रदीप बोंदरे यांनी दिली. प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष आहे.ग्रामपंचायतीच्या ठरावातून मांडली व्यथादेव्हाडी ग्रामपंचायतीने सभेत ठराव मंजूर करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यात बस थांब्याची समस्या निकाली काढणे, उड्डाणपुल अंडरपासची निर्मिती अरुंद आहे. चारचाकी वाहने येथे जाण्यास अडचण होते. उड्डाणपुलाला एकच जीना देण्यात आला आहे. किमान ये जा करण्याकरिता चार जीन्यांची गरज आहे. अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी जमा होते. ही समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा