शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:41 PM

जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : खिंडसी प्रकल्पातून सुर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडणार, जिल्हाधिकाºयांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. जेसीपी उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारे इंधनाची सोय करण्यात येईल, असे ते म्हणाले.जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव व पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, उप कार्यकारी अधिकरी मंजूषा ठवकर, कार्यकारी अभियंता मैदमवार, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, तहसिलदार अर्चना मोरे यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित होते.यावेळी जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी लागणारे जेसीपी उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिल्या. तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी व खंड विकास अधिकारी यांनी संयुक्तीक काम करुन कामास गती दयावी. तहसिलदारांनी वेळोवेळी या कामांचा आढावा घ्यावा. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर भर दयावा. यासाठी सरपंच व जिल्हा परिषद सदस्याचे सहकार्य घ्यावे.प्रत्येक उपविभागात एका तालुक्यात तीन कामे घ्यावीत, त्याचा आढावा उपविभागीय अधिकाºयांनी घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंत्राटदार काम करण्यास तयार नसतील तर सोसायटयामार्फत तसेच बेरोजगारांमार्फत काम करवून घ्या व कामाची गती वाढवा.अकार्यक्ष्म कंत्राटदाराकडून कामे प्रलंबित राहीली तर त्यांना काळया यादीत टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के कामे पूर्ण करा. यंत्रणांमध्ये समन्वय कमी आहे, तो वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी टंचाईबाबत नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच खिंडसी प्रकल्पातून सूर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडण्यात येत असून १.२ क्युबिक पाणी सोडले जात आहे. तसेच इटियाडोह धरणातून लाखांदूर तालुक्यात पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.