शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्या ६२० नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

ठळक मुद्दे९५ हजारांचा दंड वसूल : मंगल कार्यालये, हॉटेल्स, बार यांचीही तपासणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे कोरुना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येते. हाच दृष्टीकोन समोर ठेवून स्थानिक प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या शिवाय मंगल कार्यालय लॉन हॉटेल बाळ व वाईन शॉप व अन्य आस्थापनांमध्येही तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचे उद्दिष्ट समोर ठेवून भंडारा शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. भंडारा शहरातील मंगल कार्यालये, लॉन, बार, रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक करण्यात कारवाई करण्यात आली.यात १८ दुकानांसह मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. याशिवाय चार बार व रेस्टॉरंटची ही तपासणी करून या सर्वांकडून ते ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९५ हजार ५५० रुपयांची दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्यासह भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरपालिकेचे कर्मचारी प्रशांत गणवीर, मिथुन मेश्राम, संग्राम कटकवार, दादी मिश्रा, राहुल देशमुख यासह अन्य कर्मचारी सहभागी आहेत.

नागरिकांनो सावधान जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिक नियमांना तिलांजली देत आहेत. यामुळेच प्रशासनाला कडक कारवाई करण्यावरही जोर द्यावा लागत आहे. परिणामी नागरिकांनो सावधान. नियम तुमच्या हितासाठीच आहेत असे बोलण्याची नामुष्कीही ओढवली आहे. आता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या