शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पेंढरी पुर्नवसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:16 IST

जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देविहिर पडली कोरडी : बोअरवेलच्या दूषित व गढूळ पाण्याने धोका

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. यामुळे येथील महिलांना गावालगतच्या सोनेगाव बुटी येथून पिण्याचे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे..अनेक गावांचे पुर्नवसन झाले असले तरी तेथील मुलभूत सोयीसुविधेकडे नेहमी दुर्लक्ष होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तथा तालुका प्रशासन, ग्राम प्रशासन यांनी लक्ष घातले असते तर जिल्ह्यातील पुर्नवसन ग्रामवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. वेळोवेळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असते का? हा एक प्रश्नच आहे.गावातील सहा हातपंपापैकी ज्या हातपंपाचे पाणी येथील ग्रामस्थ पिण्यासाठी वापर करीत होते. आता त्या बोअरवेलला गढुळ पाणी येणे सुरु झाले. त्याचे एकमेव कारण ग्रामस्थांच्या मते जेव्हापासून त्या हातपंपावर पाणी उपसा करण्याची मोटार लावली, तेव्हापासून पाणी गढुळ येत आहे.त्यामुळे आता पिण्याचे पाणी बाहेरगावच्या बोअरवेलवरुन आणावे लागत आहे.एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बॉटलभर शुध्द पिण्याचे पाणी नसेल तर तत्काळ त्याची व्यवस्था कुठून ना कुठून तरी होते. परंतु पेंढरी पुर्नवसनातील तीनशे ते चारशे ग्रामवासीयांना तात्काळ शुध्द पिण्याचे पाणी कोण उपलब्ध करुन देणार? या पुर्नवसन मधील प्रत्येक ग्रामस्थ विकतचे पाणी घेऊ शकणार का? स्वत: विकतचे पाणी घेऊन प्यायला पैसे नाही तर मग पाळीव प्राण्यांना न्यायचे कुठे, असाही सवाल यावेळी ग्रामस्थांनी केले.ज्येष्ठ महिलांच्या डोळ्यातुन अशी समस्या पाहुन पुर्नवसन झालेच बेकार असे जाणवत होते. घर गेले, शेती गेली, रोजीरोटीही गेली आणि आज अन्न सोडा प्यायला शुध्द पाणी मिळत नसणार तर काय दु:ख होत असेल, असा सवाल पेंढरी पुर्नवसन वासीयांनी केला आहे. वृध्द महिला पुरुषांंचा विचार करुन प्रशासनाने तत्काळ समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हे अतिआवश्यक आहे. होणाºया मासीक सभेच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.-तुळशीदास कोल्हे, सदस्य, पंचायत समिती, पवनी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई