शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरी पुर्नवसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:16 IST

जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देविहिर पडली कोरडी : बोअरवेलच्या दूषित व गढूळ पाण्याने धोका

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. यामुळे येथील महिलांना गावालगतच्या सोनेगाव बुटी येथून पिण्याचे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे..अनेक गावांचे पुर्नवसन झाले असले तरी तेथील मुलभूत सोयीसुविधेकडे नेहमी दुर्लक्ष होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तथा तालुका प्रशासन, ग्राम प्रशासन यांनी लक्ष घातले असते तर जिल्ह्यातील पुर्नवसन ग्रामवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. वेळोवेळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असते का? हा एक प्रश्नच आहे.गावातील सहा हातपंपापैकी ज्या हातपंपाचे पाणी येथील ग्रामस्थ पिण्यासाठी वापर करीत होते. आता त्या बोअरवेलला गढुळ पाणी येणे सुरु झाले. त्याचे एकमेव कारण ग्रामस्थांच्या मते जेव्हापासून त्या हातपंपावर पाणी उपसा करण्याची मोटार लावली, तेव्हापासून पाणी गढुळ येत आहे.त्यामुळे आता पिण्याचे पाणी बाहेरगावच्या बोअरवेलवरुन आणावे लागत आहे.एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बॉटलभर शुध्द पिण्याचे पाणी नसेल तर तत्काळ त्याची व्यवस्था कुठून ना कुठून तरी होते. परंतु पेंढरी पुर्नवसनातील तीनशे ते चारशे ग्रामवासीयांना तात्काळ शुध्द पिण्याचे पाणी कोण उपलब्ध करुन देणार? या पुर्नवसन मधील प्रत्येक ग्रामस्थ विकतचे पाणी घेऊ शकणार का? स्वत: विकतचे पाणी घेऊन प्यायला पैसे नाही तर मग पाळीव प्राण्यांना न्यायचे कुठे, असाही सवाल यावेळी ग्रामस्थांनी केले.ज्येष्ठ महिलांच्या डोळ्यातुन अशी समस्या पाहुन पुर्नवसन झालेच बेकार असे जाणवत होते. घर गेले, शेती गेली, रोजीरोटीही गेली आणि आज अन्न सोडा प्यायला शुध्द पाणी मिळत नसणार तर काय दु:ख होत असेल, असा सवाल पेंढरी पुर्नवसन वासीयांनी केला आहे. वृध्द महिला पुरुषांंचा विचार करुन प्रशासनाने तत्काळ समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हे अतिआवश्यक आहे. होणाºया मासीक सभेच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.-तुळशीदास कोल्हे, सदस्य, पंचायत समिती, पवनी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई