शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

पेंढरी पुर्नवसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:16 IST

जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देविहिर पडली कोरडी : बोअरवेलच्या दूषित व गढूळ पाण्याने धोका

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. यामुळे येथील महिलांना गावालगतच्या सोनेगाव बुटी येथून पिण्याचे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे..अनेक गावांचे पुर्नवसन झाले असले तरी तेथील मुलभूत सोयीसुविधेकडे नेहमी दुर्लक्ष होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तथा तालुका प्रशासन, ग्राम प्रशासन यांनी लक्ष घातले असते तर जिल्ह्यातील पुर्नवसन ग्रामवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. वेळोवेळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असते का? हा एक प्रश्नच आहे.गावातील सहा हातपंपापैकी ज्या हातपंपाचे पाणी येथील ग्रामस्थ पिण्यासाठी वापर करीत होते. आता त्या बोअरवेलला गढुळ पाणी येणे सुरु झाले. त्याचे एकमेव कारण ग्रामस्थांच्या मते जेव्हापासून त्या हातपंपावर पाणी उपसा करण्याची मोटार लावली, तेव्हापासून पाणी गढुळ येत आहे.त्यामुळे आता पिण्याचे पाणी बाहेरगावच्या बोअरवेलवरुन आणावे लागत आहे.एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बॉटलभर शुध्द पिण्याचे पाणी नसेल तर तत्काळ त्याची व्यवस्था कुठून ना कुठून तरी होते. परंतु पेंढरी पुर्नवसनातील तीनशे ते चारशे ग्रामवासीयांना तात्काळ शुध्द पिण्याचे पाणी कोण उपलब्ध करुन देणार? या पुर्नवसन मधील प्रत्येक ग्रामस्थ विकतचे पाणी घेऊ शकणार का? स्वत: विकतचे पाणी घेऊन प्यायला पैसे नाही तर मग पाळीव प्राण्यांना न्यायचे कुठे, असाही सवाल यावेळी ग्रामस्थांनी केले.ज्येष्ठ महिलांच्या डोळ्यातुन अशी समस्या पाहुन पुर्नवसन झालेच बेकार असे जाणवत होते. घर गेले, शेती गेली, रोजीरोटीही गेली आणि आज अन्न सोडा प्यायला शुध्द पाणी मिळत नसणार तर काय दु:ख होत असेल, असा सवाल पेंढरी पुर्नवसन वासीयांनी केला आहे. वृध्द महिला पुरुषांंचा विचार करुन प्रशासनाने तत्काळ समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हे अतिआवश्यक आहे. होणाºया मासीक सभेच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.-तुळशीदास कोल्हे, सदस्य, पंचायत समिती, पवनी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई