शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

शेतीला दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा करा; शेतकऱ्यांत शासनाविरुद्ध कमालीची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:01 IST

तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी : धान लागवडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत धान लागवडीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. मात्र, शेतीपंपासाठी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा केला जात आहे.

परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत महावितरण व शासनाविरुद्ध कमालीची नाराजी असून, शेतकऱ्यांना धान लागवडीच्या हंगामात दिवसाला किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची रात्रीला होणारी गैरसोयी दूर करावी, सर्पदंशाचे धोक टाळावे, अशी मागणी होत आहे. 

रात्रीला पंप सुरू करण्यास जाणे धोकादायकशेतीपंपाला विद्युत पुरवठा रात्री होत असल्याने रात्रीच्या वेळी कृषीपंप सुरू करण्यासाठी जाणे अत्यंत कठीण असते. अनेकांचे शेत हे गावापासून व घरापासून दूर असल्याने रात्री पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक ठरते. याशिवाय साप, विंचू आणि अन्य वन्यप्राण्यांचाही धोका असतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे.

शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजपावसाची अनिश्चितता, वाढती इनपुट कॉस्ट, बाजारातील भावाचे चढ-उतार यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच वीज पुरवठ्यासाठी गैरसोयीचा वेळ, त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे.

"मागील अनेक वर्षांपासून दिवसा किमान १२ तास वीजपुरवठ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दिवसाच्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी सुरक्षितपणे शेतकाम करून चांगले उत्पादन सहज घेऊ शकतो. परंतु हे वास्तव शासनाला केव्हा कळेल ?"- ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था तथा शेतकरी

टॅग्स :bhandara-acभंडाराelectricityवीजfarmingशेतीFarmerशेतकरी