शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेतीला दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा करा; शेतकऱ्यांत शासनाविरुद्ध कमालीची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:01 IST

तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी : धान लागवडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत धान लागवडीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. मात्र, शेतीपंपासाठी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा केला जात आहे.

परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत महावितरण व शासनाविरुद्ध कमालीची नाराजी असून, शेतकऱ्यांना धान लागवडीच्या हंगामात दिवसाला किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची रात्रीला होणारी गैरसोयी दूर करावी, सर्पदंशाचे धोक टाळावे, अशी मागणी होत आहे. 

रात्रीला पंप सुरू करण्यास जाणे धोकादायकशेतीपंपाला विद्युत पुरवठा रात्री होत असल्याने रात्रीच्या वेळी कृषीपंप सुरू करण्यासाठी जाणे अत्यंत कठीण असते. अनेकांचे शेत हे गावापासून व घरापासून दूर असल्याने रात्री पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक ठरते. याशिवाय साप, विंचू आणि अन्य वन्यप्राण्यांचाही धोका असतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे.

शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजपावसाची अनिश्चितता, वाढती इनपुट कॉस्ट, बाजारातील भावाचे चढ-उतार यामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच वीज पुरवठ्यासाठी गैरसोयीचा वेळ, त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे.

"मागील अनेक वर्षांपासून दिवसा किमान १२ तास वीजपुरवठ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दिवसाच्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी सुरक्षितपणे शेतकाम करून चांगले उत्पादन सहज घेऊ शकतो. परंतु हे वास्तव शासनाला केव्हा कळेल ?"- ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था तथा शेतकरी

टॅग्स :bhandara-acभंडाराelectricityवीजfarmingशेतीFarmerशेतकरी