शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे.

ठळक मुद्देभाकप व किसान सभेचे आयाेजन : तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किसान कामगार विरोधी मोदी सरकारने तीन काळे शेतकी  कायदे मंजूर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता, त्याला शनिवार रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ, तसेच तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याच्या व इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार भंडारा येथे  देशव्यापी चेतावणी दिन  पाळण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे  सचिव माधवराव बांते यांनी केले.शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे. खमारी बुट्टी (ता. भंडारा) येथील पूर पीडित गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांची घरे पडली, त्यांना ९५ हजारांचे आर्थिक सहाय्य, अतिक्रमित घरकूलधारकांची घरे नियमानुकूल करून मालकी पट्टे देण्यात यावे. गणेश चिचामे यांना महसूल विभागाच्या चुकीमुळे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत पट्ट्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे. नंदकिशोर रामटेके व इतर प्रलंबित  जबरान जोतदारांना मालकी पट्टे  देण्यात यावे. महादेव आंबाघरे सुरेवाडा पुनर्वसन यांना  मंजूर भूखंड देण्यात यावे. तसेच ग्रामसेवक कॉलनी भंडारा येथील उर्वरित २७ प्रकल्पग्रस्तांना मोबदला व भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

ठाणेदारांना निवेदनविविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी ठाणेदारांना निवेदन करण्यात आले. शिष्टमंडळात हिवराज उके, माधवराव बांते सदानंद इलमे, महानंदा गजभिये, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडेे, गणेश चिचामे, विलास केजकर, महादेव ताराचंद आंबाघरे, हरिदास जांगडे, गिरधारी मेश्राम, सुनील बोरकर आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन