शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रस्ताव ५०० घरकुलांचे; मंजुरी मिळाली केवळ १०० घरकुलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 14:16 IST

ग्रामीण रमाई आवास योजनेतील प्रकार : लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. केंद्र सरकार व राज्य शासनाने ग्रामीण भागातील गरजूंना घर देण्याचा संकल्प केला जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. तुमसर तालुक्यात रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ५०० घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

परंतु केवळ १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थी निवड योजनेचे प्रमुख हे पालकमंत्री असतात. येथे रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे घरकुलांचे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. तुमसर तालुक्यात पंचायत समितीमार्फत रमाई आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती. त्या यादीला २०२३-२०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली. यात ५०० लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी केवळ १०० लाभार्थ्यांची यादी मंजुरी प्राप्त झाली आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांच्या कार्यालयामार्फत ते मंजूर करण्यात आली. पालकमंत्री या समितीचे प्रमुख असतात. हे विशेष.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा सर्वात मोठा तालुका असून ग्रामीणकरिता रमाई आवास योजना असून येथे अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांची निवड या रमाई आवास योजनेअंतर्गत करण्यात येते. केवळ १०० लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या गरजू लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न कधी पूर्ण होणार का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. 

रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांमध्ये येथे असंतोष दिसून येत आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याकरिता लाभार्थ्यांना अनेक दिवस शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागली. प्रस्ताव तयार करताना पैसा खर्च करावा लागला. श्रम व वेळ येथे अधिक खर्च केल्यानंतरही लाभार्थ्यात निराशाच पदरी पडली आहे. पुन्हा ४०० गरजू किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न येथे लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तुमसर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यात मोठ्या गावातील एक किंवा दोनच लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली आहे.

तुमसर तालुक्यात केवळ रमाई आवास योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार असून उंटाच्या तोंडात येथे जीरा घालण्याच्या प्रकार दिसून येत आहे. शासनाने उर्वरित गरजूंना तात्काळ घरकुल मंजूर न केल्यास लाभार्थ्यांसोबत जन आंदोलन करण्यात येईल.- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रbhandara-acभंडारा