शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

प्रस्ताव ५०० घरकुलांचे; मंजुरी मिळाली केवळ १०० घरकुलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 14:16 IST

ग्रामीण रमाई आवास योजनेतील प्रकार : लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. केंद्र सरकार व राज्य शासनाने ग्रामीण भागातील गरजूंना घर देण्याचा संकल्प केला जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. तुमसर तालुक्यात रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ५०० घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

परंतु केवळ १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थी निवड योजनेचे प्रमुख हे पालकमंत्री असतात. येथे रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे घरकुलांचे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. तुमसर तालुक्यात पंचायत समितीमार्फत रमाई आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती. त्या यादीला २०२३-२०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली. यात ५०० लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी केवळ १०० लाभार्थ्यांची यादी मंजुरी प्राप्त झाली आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांच्या कार्यालयामार्फत ते मंजूर करण्यात आली. पालकमंत्री या समितीचे प्रमुख असतात. हे विशेष.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा सर्वात मोठा तालुका असून ग्रामीणकरिता रमाई आवास योजना असून येथे अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांची निवड या रमाई आवास योजनेअंतर्गत करण्यात येते. केवळ १०० लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या गरजू लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न कधी पूर्ण होणार का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. 

रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांमध्ये येथे असंतोष दिसून येत आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याकरिता लाभार्थ्यांना अनेक दिवस शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागली. प्रस्ताव तयार करताना पैसा खर्च करावा लागला. श्रम व वेळ येथे अधिक खर्च केल्यानंतरही लाभार्थ्यात निराशाच पदरी पडली आहे. पुन्हा ४०० गरजू किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न येथे लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तुमसर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यात मोठ्या गावातील एक किंवा दोनच लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली आहे.

तुमसर तालुक्यात केवळ रमाई आवास योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार असून उंटाच्या तोंडात येथे जीरा घालण्याच्या प्रकार दिसून येत आहे. शासनाने उर्वरित गरजूंना तात्काळ घरकुल मंजूर न केल्यास लाभार्थ्यांसोबत जन आंदोलन करण्यात येईल.- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रbhandara-acभंडारा