धान पिकावर अळींचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: September 9, 2014 23:15 IST2014-09-09T23:15:54+5:302014-09-09T23:15:54+5:30
शेतकऱ्यावर कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला असून धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले आहे. त्यात काही धान पिके फस्त झाली असून काही धानपिकावर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

धान पिकावर अळींचा प्रादुर्भाव
बारव्हाा : शेतकऱ्यावर कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला असून धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले आहे. त्यात काही धान पिके फस्त झाली असून काही धानपिकावर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची किटकनाशक औषधांची फवारणी करीत आहे. मात्र रोग आटोक्यात येत नाही. तरी शासनाने कृषी विभागामार्फत सवलतीच्या दरात किटकनाशक औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी बारव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी स्वत:च्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वतोपरी प्रयत्नाची फसगत होत असून बळीराजा कर्जाच्या कचाट्यात दिवसेंदिवस फसत आहे. मागील तीन वर्षापासून कधी पूर, महापूर व अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस आणि त्यात भर म्हणून विविध धानपिकांवर रोगांचे आक्रमण अशा कालचक्राचा सामना करताना बळीराजाला शेतीसाठी खर्च अधिक तर त्या बदल्यात उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र बळीराजा आशावादी असल्याने आज ना उद्या निसर्ग साथ देईल व कर्जाची परतफेड करू या आशेवर दरवर्षी शेतीकामात जोमाने लागतो व शेती कसतो.
यावर्षी तर पावसाळा ऋतूला सुरुवात होऊनही दीड महिना पाऊस पडलाच नाही. शेतात पेरलेले धान्य जागीच फस्त झाले. दुबार पेरणीकरून शकीबशी शेतात रोवणी केली. मात्र कधी पाऊस पडतो तर कधी पडत नाही. अशा परिस्थितीत धान्य पिके वाळण्याच्या तारनेत आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी शेतीला पाणी दिले. मात्र ज्यांच्याकडे निसर्गाच्या पावसाशिवाय काहीच नाीह त्यांचे काय? सध्या धान पिक काडीवर, गर्भावस्था आलेली असून त्यांच्यावर खोडकिडा, अळी, करपा, तुडतुडा आदी रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.
सदर रोगावर दुबार, तिबार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाही तरी शासनाने याची दखल घेत कृषी विभागामार्फत सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरात शेतकऱ्यांनी केली आहे.