शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

घरगुती हिंसाचाराला वेळीच प्रतिबंध घाला!

By admin | Updated: March 23, 2017 00:24 IST

कायदे हे महिलांच्या सबलीकरणासाठी आहेत. महिलांना जोपर्यंत पूर्णपणे संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही,

नीता ठाकरे यांचे प्रतिपादन : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणभंडारा : कायदे हे महिलांच्या सबलीकरणासाठी आहेत. महिलांना जोपर्यंत पूर्णपणे संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, कायद्याचा परिपूर्ण वापर झाला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेकविध कायदे आहेत. परंतु त्यांची जाणीव महिलांमध्ये नाही. पोलिसात गेलो तर बदनामी होईल या हेतुने घरघुती हिंसाचाराच्या घटना पुढे येत नाही. आज एखादी घटना छोटी वा प्राथमिक स्वरुपाची असेल जर तिला वेळीच पायबंद घातला नाही तर पुढे जावून ती घटना गंभीर स्वरुपाची होवू शकते, असे मत महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत कार्यशाळेत उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.सदर कार्यशाळेला अध्यक्षीय मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक विनिता साहु म्हणाल्या, घरघुती हिंसाचार ही संपूर्ण देशासमोरील समस्या असुन ती शिक्षित असो, अशिक्षित असो वा ग्रामिण भागातील स्त्री असो या सर्वांशी निगडित समस्या आहे. कौटुंबिक हिंसा ही सर्वात मोठी हिंसा असून अशा हिंसेला वेळीच प्रतिबंध पडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक विनिता साहु यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने प्रामाणिक आणि सकारात्मक प्रयत्न चालविलेले आहे. त्यासाठीच महिला सरंक्षण कायदे तयार केले गेले. खोट्या तक्रारी करुन महिलांनी स्त्रीत्वाचा गैरवापर करु नये. महिलांनी कायद्यांचा उददेश व भूमिका लक्षात घेऊन कुटूंब व्यवस्था कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठीच कायद्यातील कलमांचा अंतर्भूत अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, महिला व बाल विकास अधिकारी सुरेश ठाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पवार आदींनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद डाबेराव यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. कविता भोंडगे, अ‍ॅड. मंजुषा गायधने, मृणाल मुनीश्वर, वैशाली केळकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले. तर आभार जिल्हा संरक्षण अधिकारी सुनिल माहुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी परीविक्षा अधिकारी एम. एम. आंबेडारे, विधी सेवा सल्लागार सुवर्णा धानकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवानंद देशमुख, तालुका संरक्षण अधिकारी भेंडारकर, लोथे, गजभिये, कोल्हे, गिरेपुंजे, बाल संरक्षण अधिकारी नितिन साठवणे, नामदेव भुरे, अजित नागोशे तथा कार्यालयातील इतर कमर्चारी वृंद यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)