शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘एमपीएससी’ परीक्षार्थ्यांपुढे परीक्षा केंद्राचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:08 PM

राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो विद्यार्थी मुळ गावी निवडलेल्या महानगरातील केंद्रावर जायचे कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई - पुण्यात क्लासेससाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपल्या मुळ गाव परत आले. परिस्थिती पूर्व पदावर कधी येणार सांगणे कठीण आहे. अशातच राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. आपल्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्ष केंद्र निवडण्याची मुभा द्यावी अशी मागणी होत आहे.

विदर्भातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी जाता. भंडारा जिल्ह्यातूनही शेकडो विद्यार्थी महानगरात गेले आहेत. तेथे महागडे क्लासेस लावून किरायाच्या खोल्याही घेतल्या. सुस्थितीत अभ्यास सुरु असताना कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला. आता तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरात गेलेले प्रत्येक जण आता आपल्या मुळ गावी आले आहेत. गावात येवून त्यांनी आपला अभ्यास आॅनलाईन पद्धतीने सुरू ठेवला. अशातच राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. मुंबई-पुण्यात असताना या परीक्षार्थ्यांनी तेथीलच परीक्षा केंद्र निवडले होते.

मात्र लॉकडाऊनमुळे ही मंडळी आता गावात आली. परीक्षेला जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या भाड्याच्या खोल्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांना मुंबई अथवा पुण्याच्या परीक्षा केंद्रावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण गरीब होतकरू विद्यार्थी अडचणीत सापडले आहे. आपण केलेली मेहनत वाया तर जाणार नाही ना असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

आता परीक्षेसाठी केवळ ४० दिवस उरले आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यातील जवळपास दोन हजार विद्यार्थी यामुळे संकटात आले आहेत. मुळ गावी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा द्यावी, त्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.ऑनलाईन पद्धतीने बदल शक्यराज्य लोकसेवा आयोगाची अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात बदल करणे सहज शक्य आहे. भंडारा जिल्ह्यासाठी सहा उपकेंद्रावर २११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून निवड केली आहे. या ठिकाणी १३ उपकेंद्रावर ३८४० परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतील अशी क्षमता आहे. अशीच स्थिती इतरही जिल्ह्याची आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना सोयीचे होईल असे परीक्षा केंद्र लॉकडाऊन काळात द्यावे अशी मागणी आहे.अनेक विद्यार्थी महानगरात कोचिंगसाठी गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत. त्यांच्यापुढे परीक्षेला जाण्याचा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी आपण एमपीएससीशी पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री, उच्चतंत्र शिक्षणमंत्री यांच्यासह एमपीएससीच्या अध्यक्षांनाही निवेदन पाठविले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.- उमेश कोर्राम, अध्यक्ष स्टुडंटस् राईटस् असोसिएशन ऑफ इंडिया

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा