शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सरपंच-उपसरपंचांना मिळाला स्थगनादेश

By admin | Updated: February 4, 2015 23:09 IST

ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले.

जवाहरनगर / खरबी : ग्रामपंचायत खरबी नाका येथील सरपंच उपसरपंचासह तीन सदस्यांनी पदाचा दुरूपयोग करीत नागपूर उपायुक्तांनी सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्यांचे पद खारीज केले. याला आवाहन देत त्यांनी स्थगनादेश प्राप्त केले.ग्रामपंचायत खरबी नाका येथील ग्रामपंचायत सदस्य सुनिता आकरे, रंजना मेश्राम व रत्नमाला वाडीभस्मे यांनी नागपूर विभागीय उपायुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केले. यात साईनाथ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने नाहरकत प्रमाणपत्र हे बेकायदेशीरपणे देण्यात आले असल्याचा आरोप लावला होता. यासंबंधी अर्जदार व गैरअर्जदार यांचे युक्तीवादाचे अवलोकन केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ अन्वये प्रकरण फेरचौकशी करीता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचेकडे आले असता. गैरअर्जदार यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचे निष्कर्षीत होत असल्याचा अहवाल उपायुक्तांना पाठविले. तद्नुसार अर्जदारानी लावले चार आरोपापैकी दोन आरोप सिद्ध होत असल्याचा ठपका ठेवीत गैरअर्जदार यांनी आपसी संगनमताने ही अनियमिता केली असल्याने गैरअर्जदारानी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध होते. या आशयाचे आदेश २२ जानेवारी २०१५ रोजी उपायुक्त पुनर्वसन नागपूर विभाग नागपूर एमएएच खान यांनी नमुद केले. याला आवाहन देत सरपंच विद्याताई मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, ग्रामपंचायत सदस्य लता गोस्वामी, सुरेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांनी ग्रामविकास राज्य मंत्री यांच्या दालनात अपील दाखल करण्यात आली.यात सरपंच विद्या मोथरकर, उपसरपंच मनोज गिरीपुंजे, सदस्य लता गोस्वामी, सुनेंद्र मोथरकर, वाल्मिक मोथरकर यांचा समावेश होता. सखोल चौकशी करीत सरपंच उपसरपंच व इतर तीन सदस्यांना ग्रामविकास राज्यमंत्री दालनाने स्थगनादेश दिली. (वार्ताहर)