शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:58 IST

मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू : सिटीझन कॉप ठरणार गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असून आता हा उपक्रम राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंमलात आणला असून फिरते पोलीस ठाणे हे ‘रोल मॉडेल’ ठरल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.फिरते पोलीस ठाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. राज्यात आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना नाही. गावात कुणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु पोलीस अधीक्षक साहू यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणेच जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प करून हा उपक्रम सुरू केला.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहान मोठ्या गावात फिरते पोलीस ठाणे पथक जावून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतात.या तक्रारींचे निराकरण त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत शंभराच्यावर गावात हे फिरते पोलीस ठाणे पथक पोहोचले आणि नागरिकांच्या हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले. हा उपक्रम आजही सुरूच आहे. दरम्यान, या उपक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना गौरविले होते.अवैधधंदेमुक्तीसाठी धाडसत्रभंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री, घरफोडी, वाहनचोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून २०१६ मध्ये खूनाच्या २३ घटना घडल्या होत्या त्यापैकी २० घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली.दरोड्याचे दोन आणि घरफोडीचे ३९, सोनसाखळी पळवून नेल्याच्या आठ घटना उघडकीस आणले आहेत. त्यापूर्वी आयपीलच्या धाडीत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी निसंकोचपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही केले आहे.‘निर्भय बनो’ उपक्रमाला प्रतिसादशिक्षण घेण्याच्या वयात केवळ आमिषांचे प्रलोभन दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात समज नसलेल्या लहान मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही उपविभागातील शाळांमधील कार्यशाळा घेऊन विद्यार्थिनीमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत ज्या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन हा विषय समजून घेतला त्यांना इतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी यशदाचे प्रशिक्षक, डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्वांना आमंत्रित केल्याचे विनिता साहू यांनी ‘सांगितले.