शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पोलिसांचे आरोपीला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:34 PM

पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

ठळक मुद्देनिघवी येथील घटना : ४८ तासानंतरही गुन्ह्यातील साहित्य जप्त नाही

आॅनलाईन लोकमतभंडारा : पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणात युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान ४८ तासानंतरही पवनी पोलिसांनी याप्रकरणातील साहित्य जप्त केले नाही. सोबतच महिलेला मारहाण व विनयभंग केलेली असतानाही केवळ आरोपींना वाचविण्याकरिता पोलिसांनी आवश्यक असलेली कलम दाखल केली नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा पराभव झाला. गावात मंडईनिमित्त दंडारीचा कार्यक्रम असल्याने घटनेच्या दिवशी महेश हा गावातील एका पानटपरीवर बसला होता. यावेळी निवडणुकीच्या कारणावरून ब्राम्हणकर यांनी महेश फुंडे याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर ब्राम्हणकर याने महेशला पानठेल्यावरील खर्रा घोटण्याचा लाकडी पाटीने बेदम मारहाण केली. यात महेश गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला सोडविण्यासाठी महेशचा भाऊ बंबू फुंडे व त्याची आई शांताबाई हे धावून आले. यावेळी ब्राम्हणकर याने बंबू व त्याच्या आईला मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत आईच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटले. या झटापटीत आईचा विनयभंग करण्यात आला. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने भांडण सोडून जखमी महेशला पवनी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दोन दिवस ठेवल्यानंतरही डॉक्टरांनी त्याच्यावर थातूरमातूर औषधोपचार केल्याने त्याची प्रकृती खालावली. यामुळे तेथील डॉक्टरांनी महेशला थेट नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान रुग्णाची सुविधा व खान्या-पिण्याची व्यवस्था होणार नसल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले.जखमी महेशवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान घटनेला ४८ तासांचा अवधी लोटला असूनही पवनी पोलिसांनी याप्रकरणात आवश्यक असलेले मारहाणीचे पुरावे व जखमी महेशचे रक्ताचे भरलेले कपडे अद्यापही जप्त केलेले नाही. सोबतच जखमीच्या आईचा विनयभंग झालेला असतानाही याप्रकरणात पवनी पोलिसांनी केवळ आरोपीला वाचविता यावा यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.