शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

विरलीच्या ग्रामसभेत प्लास्टीकबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:25 IST

काही दिवसापासून उघडया हागणदारीच्या जागा स्वच्छ करून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीसाठी ग्राम पंचायतने पाउले उचलले असताना २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्राम सभेमध्ये या ऐतिहासीक निर्णयाने स्वागत करून प्लॉस्टीक बंदीचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामसभेला गर्दी : नागरिकांनी घेतली प्लास्टीक बंदीची शपथ

आॅनलाईन लोकमतभंडारा : काही दिवसापासून उघडया हागणदारीच्या जागा स्वच्छ करून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीसाठी ग्राम पंचायतने पाउले उचलले असताना २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्राम सभेमध्ये या ऐतिहासीक निर्णयाने स्वागत करून प्लॉस्टीक बंदीचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. ग्राम पंचायतीमध्ये हा ऐतिहासीक निर्णय ग्रामसभेत नागरीक, व्यावसायीकांनी घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी ग्रामसेवक संघटनांचा २६ जानेवारीच्या ग्रामसभा घेण्यावर बहिष्कार होता, अशातही विरली बुज मध्ये ग्राम पंचायतीने पुढाकार घेत ग्रामसभा घेवून प्लॉस्टीक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर अंमलबजावणी साठी नागरिकांनी प्लॉस्टीक बंदीची शपथ घेतली व यापुढे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.सन २०१६-१७ मध्ये विरली बुज. गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतरही मासळ मार्गाकडे जाणा-या गावात लगतची जागा अस्वच्छ होती. खताचे खडडे, घनकचरा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. बहुतांश कुटूंब त्या जागेवर हागणदारीसाठी जात होते. अखेर ग्राम पंचायतचे सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलींद सिव्हंगडे व सचिव विरूडकर व ग्राम पंचायत पदाधिका-यांनी तिन्ही जागा स्वच्छ सुंदर करण्याचा निर्धार केला. सर्वात पहिले मासळकडे मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेचे मांसमटनचे दुकाने इतरत्र हलविण्यात आली. त्यातून होणारी घाण थांबविण्यात आली. खताचे खडडे हटविण्यात आले. त्या ठिकाणी वृक्ष लागवड, नेटचे जाळे, बसण्यासाठी खुर्च्यां व विद्युतची व्यवस्था करण्यात आली. तब्बल दीड महिन्यापासून गावात करण्यात आलेल्या स्वच्छते दरम्यान प्लास्टिक कचरा हा मोठ्या प्रमाणात आढळून आला. घरात पिशव्यांचा वापर, किराणा, पानठेला, हॉटेल व अन्य व्यवसायाच्या ठिकाणावरून निघणाºया प्लास्टिकमुळे मानवी आरोग्य व पर्यावरण धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या मागार्ने शेतजमिनीत जाणाºया प्लास्टिकमुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत आहे.व्यावसायिकांना कचराकुड्यांचे वितरणलाखांदूर तालुक्यातील विरली बुज ग्राम पंचायत ही लाखांदूर व पवनी या मुख्य मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. बाजारपेठ असल्याने या परिसरातील अनेक गावांचा संपर्क आहे. गावात हॉटेल,पानठेले,किराणा व विविध प्रकारचे व्यवसाय आहे. त्यामुळे विरली बुज ग्राम पंचायतीच्या वतीने कचरा कुड्यांचे वितरण करण्यात आले. सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलींद सिव्हंगडे व पदाधिकारी यांचे वतीने वितरण करण्यात आले.