शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

By admin | Updated: February 18, 2017 00:28 IST

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाना पटोले : शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभपवनी : केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील पातळीवर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविल्या जावेत तसेच योजना जनतेच्या दारी पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. गुरूवारी पवनी येथे झालेल्या जनता दरबारात ते बोलत होते.पटोले म्हणाले, या योजनाचा लाभ सर्व गोरगरीब जनतेला व गरजूंना झालाच पाहिजे. याकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. त्याच्याकडे दिलेली जबाबदारी अथवा शासकीय व जनतेची कामे करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना देखील माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना या प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याच पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केले पाहिजे. शासनाच्या योजना आपल्या दारी आल्या आहेत. या योजना धावल्या पाहिजेत तरच आपला विकास होईल. सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी करावा अन्यथा त्यांना कार्यवाहीस पुढे जावे लागेल. यानंतर लोकांना सतरावेळा हेलपट्या खावे लागणार नाही, असेही त्यांनी बजावून सांगितले. प्रास्ताविक तहसिलदार वासनिक यांन केले. जनता दरबारात १५० चे वर प्रकरणे वा तक्रारी जनतेकडून आल्यात यात सर्वात अधिक प्रकरणे महसूल विभागाशी व गोसे धरणाशी संबंधीत आहेत. गोसे धरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, पुर्नवसन, जमिनीचा मोबदला, फेरफार तसेच जमिनीचा सातबारा संबंधी व घरकुलासंबंधीच्या सर्व समस्यांचे निवारण खासदार नाना पटोले यांनी केले. दुपारी १.३० वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजता समाप्त झाला. एकूण १५ शासकीय विभागाचा यात सहभाग होता. सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत व ते सोडविण्याचे आश्वासन देखील दिलीत. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. अवसरे पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, भाजपा तालुका अध्यक्ष के.डी. मोटघरे, संदीप शेटीवार, ठाणेदार मधुकर गिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.पी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार शुशांक कांबळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)