शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

By admin | Updated: February 18, 2017 00:28 IST

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नाना पटोले : शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभपवनी : केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील पातळीवर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविल्या जावेत तसेच योजना जनतेच्या दारी पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. गुरूवारी पवनी येथे झालेल्या जनता दरबारात ते बोलत होते.पटोले म्हणाले, या योजनाचा लाभ सर्व गोरगरीब जनतेला व गरजूंना झालाच पाहिजे. याकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. त्याच्याकडे दिलेली जबाबदारी अथवा शासकीय व जनतेची कामे करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना देखील माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना या प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याच पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केले पाहिजे. शासनाच्या योजना आपल्या दारी आल्या आहेत. या योजना धावल्या पाहिजेत तरच आपला विकास होईल. सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी करावा अन्यथा त्यांना कार्यवाहीस पुढे जावे लागेल. यानंतर लोकांना सतरावेळा हेलपट्या खावे लागणार नाही, असेही त्यांनी बजावून सांगितले. प्रास्ताविक तहसिलदार वासनिक यांन केले. जनता दरबारात १५० चे वर प्रकरणे वा तक्रारी जनतेकडून आल्यात यात सर्वात अधिक प्रकरणे महसूल विभागाशी व गोसे धरणाशी संबंधीत आहेत. गोसे धरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, पुर्नवसन, जमिनीचा मोबदला, फेरफार तसेच जमिनीचा सातबारा संबंधी व घरकुलासंबंधीच्या सर्व समस्यांचे निवारण खासदार नाना पटोले यांनी केले. दुपारी १.३० वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजता समाप्त झाला. एकूण १५ शासकीय विभागाचा यात सहभाग होता. सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत व ते सोडविण्याचे आश्वासन देखील दिलीत. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. अवसरे पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, भाजपा तालुका अध्यक्ष के.डी. मोटघरे, संदीप शेटीवार, ठाणेदार मधुकर गिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.पी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार शुशांक कांबळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)