शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM

तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले.

ठळक मुद्देपरीक्षा अर्जच भरले नाही : आदिवासी विकास युवा परिषदेच आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुदानित माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील ३४ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेचे अर्जच भरले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेतली.तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे सदर ३४ आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात पालक येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बुधवारी सकाळी धडकले. त्यांनी या कार्यालयात ठिय्या दिला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना जवळच्या शासकीय आश्रमशाळेत समायोजित करावे, विशेष बाब म्हणून परीक्षा अर्ज भरून घ्यावे, शैक्षणिक कार्यात हलगर्जी केल्याबद्दल शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करावी, शाळेला दंड ठोकून प्रशासकीय कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी या आंदोलनाची दखल घेतली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्ते पालक तात्काळ परीक्षा फॉर्म भरून घेण्याच्या मागणीवर ठाम होते. वृत्त लिहिस्तोवर पालक ठिय्या देऊन होते.विलंब शुल्काचा दोन हजार बसणार भुर्दंडसंस्थेच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अर्ज शिक्षण मंडळाकडे सादर झाले नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी विद्यार्थ्यांना अर्ज भरावयाचे असल्यास त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. एका विद्यार्थ्याला साधारणत: दोन हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हा भुर्दंड आदिवासी पालकांसाठी मोठा असून यात तोडगा काढण्याची मागणी आहे.

टॅग्स :Schoolशाळा