शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले.

ठळक मुद्देपरीक्षा अर्जच भरले नाही : आदिवासी विकास युवा परिषदेच आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुदानित माध्यमिक निवासी आश्रम शाळेतील ३४ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेचे अर्जच भरले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेतली.तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने परीक्षा अर्जच भरले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे सदर ३४ आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात पालक येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बुधवारी सकाळी धडकले. त्यांनी या कार्यालयात ठिय्या दिला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना जवळच्या शासकीय आश्रमशाळेत समायोजित करावे, विशेष बाब म्हणून परीक्षा अर्ज भरून घ्यावे, शैक्षणिक कार्यात हलगर्जी केल्याबद्दल शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करावी, शाळेला दंड ठोकून प्रशासकीय कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी तथा या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी या आंदोलनाची दखल घेतली. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्ते पालक तात्काळ परीक्षा फॉर्म भरून घेण्याच्या मागणीवर ठाम होते. वृत्त लिहिस्तोवर पालक ठिय्या देऊन होते.विलंब शुल्काचा दोन हजार बसणार भुर्दंडसंस्थेच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अर्ज शिक्षण मंडळाकडे सादर झाले नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी विद्यार्थ्यांना अर्ज भरावयाचे असल्यास त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. एका विद्यार्थ्याला साधारणत: दोन हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हा भुर्दंड आदिवासी पालकांसाठी मोठा असून यात तोडगा काढण्याची मागणी आहे.

टॅग्स :Schoolशाळा