शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:29 IST

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी चिंताजनक ठरणार : मेंढा परिसरात नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. आता सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याकरीता जन प्रबोधनाची गरज आहे.नळ आल्यानंतर घरातील पाणी भरून झाल्यानंतर अनेक जण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही दुचाकी वाहणे, चारचाकी वाहने व गोठ्यातील जनावरे रस्त्यावरून जाणून धूत असतात. पाणी भरून झाल्यानंतर नळ बंद करणे गरजेचे असताना नळ सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपयोगी पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणारी आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे.एकीकडे गुंडभर पिण्याचे पाण्यासाठी पायपिट पहावयास मिळते. तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय दिसून येतो. यावर पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.नळाला शुद्ध पाणी येण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात. नदीतील पाणी पाईप लाईनमधून आल्यानंतर शुद्धीकरण यंत्रात पाणी शुद्ध केल्या जाते. यासाठी प्रशासनाला मोठा खर्च येतो. पाणी शुद्ध झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत साठवणूक करून दररोज पहाटेपासून वार्डा-वार्डात वितरीत केल्या जातो.या सर्व कायार्साठी मोठी मेहनत व खचार्चा भार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु या सर्व बाबींचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लिटर पाणी लागते. अशा पद्धतीने पाणी वापरले तर पाणी पूररणार कसे, नळाचे पाणी जाई पर्यंत अनेक जण नको तितके पाणी वापरतात.घरातील कामे झाली की, पाईप जोडतात. मग ते पाणी अंगणात, झाडांना वाया जाई पर्यंत टाकत असतात. त्यातही चारचाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच जनावरे धुण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असते. याचाही विचार होणे अंत्यत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Waterपाणी