शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:29 IST

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी चिंताजनक ठरणार : मेंढा परिसरात नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. आता सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याकरीता जन प्रबोधनाची गरज आहे.नळ आल्यानंतर घरातील पाणी भरून झाल्यानंतर अनेक जण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही दुचाकी वाहणे, चारचाकी वाहने व गोठ्यातील जनावरे रस्त्यावरून जाणून धूत असतात. पाणी भरून झाल्यानंतर नळ बंद करणे गरजेचे असताना नळ सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपयोगी पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणारी आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे.एकीकडे गुंडभर पिण्याचे पाण्यासाठी पायपिट पहावयास मिळते. तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय दिसून येतो. यावर पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.नळाला शुद्ध पाणी येण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात. नदीतील पाणी पाईप लाईनमधून आल्यानंतर शुद्धीकरण यंत्रात पाणी शुद्ध केल्या जाते. यासाठी प्रशासनाला मोठा खर्च येतो. पाणी शुद्ध झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत साठवणूक करून दररोज पहाटेपासून वार्डा-वार्डात वितरीत केल्या जातो.या सर्व कायार्साठी मोठी मेहनत व खचार्चा भार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु या सर्व बाबींचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लिटर पाणी लागते. अशा पद्धतीने पाणी वापरले तर पाणी पूररणार कसे, नळाचे पाणी जाई पर्यंत अनेक जण नको तितके पाणी वापरतात.घरातील कामे झाली की, पाईप जोडतात. मग ते पाणी अंगणात, झाडांना वाया जाई पर्यंत टाकत असतात. त्यातही चारचाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच जनावरे धुण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असते. याचाही विचार होणे अंत्यत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Waterपाणी