शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:29 IST

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची नासाडी चिंताजनक ठरणार : मेंढा परिसरात नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. आता सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याकरीता जन प्रबोधनाची गरज आहे.नळ आल्यानंतर घरातील पाणी भरून झाल्यानंतर अनेक जण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही दुचाकी वाहणे, चारचाकी वाहने व गोठ्यातील जनावरे रस्त्यावरून जाणून धूत असतात. पाणी भरून झाल्यानंतर नळ बंद करणे गरजेचे असताना नळ सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपयोगी पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणारी आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे.एकीकडे गुंडभर पिण्याचे पाण्यासाठी पायपिट पहावयास मिळते. तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय दिसून येतो. यावर पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.नळाला शुद्ध पाणी येण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात. नदीतील पाणी पाईप लाईनमधून आल्यानंतर शुद्धीकरण यंत्रात पाणी शुद्ध केल्या जाते. यासाठी प्रशासनाला मोठा खर्च येतो. पाणी शुद्ध झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत साठवणूक करून दररोज पहाटेपासून वार्डा-वार्डात वितरीत केल्या जातो.या सर्व कायार्साठी मोठी मेहनत व खचार्चा भार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु या सर्व बाबींचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लिटर पाणी लागते. अशा पद्धतीने पाणी वापरले तर पाणी पूररणार कसे, नळाचे पाणी जाई पर्यंत अनेक जण नको तितके पाणी वापरतात.घरातील कामे झाली की, पाईप जोडतात. मग ते पाणी अंगणात, झाडांना वाया जाई पर्यंत टाकत असतात. त्यातही चारचाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच जनावरे धुण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असते. याचाही विचार होणे अंत्यत गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Waterपाणी