शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 15:50 IST

संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही.

ठळक मुद्देएसटीचा संप सुरूच दुचाकी, कार अन् खासगी वाहनाने प्रवास

भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आणि राज्यातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली. सुरूवातीच्या दोन आठवड्यांत प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु आता महिना उलटूनही संप मिटण्याची चिन्हे नाही. एसटीवाचून कुणाचे आता अडत नाही, असेच चित्र सर्वत्र आहे. बाहेरगावी जाण्यासाठी प्रत्येकाने पर्याय शोधला आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी महिनाभरापासून संप सुरू आहे. भंडारा विभागातील सहा आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. तब्बल १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची एसटी बंद असल्याने मोठी धांदल उडाली. बाहेरगावी जाताना विचार करावा लागत होता. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना बाहेर जाणे कठीण झाले होते. परंतु आता संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. जवळपासच्या गावाला जाण्यासाठी दुचाकीचा आधार घेतला जात आहे. तर लांब पल्ल्याच्या ठिकाणी कार आणि खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही.

साकोली आगारातून दोन फेऱ्या

संपकाळात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बससेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यात केवळ साकोली आगारातून गत सहा दिवसांपासून दोन फेऱ्या दररोज निघत आहे. या सहा दिवसात एसटीला केवळ ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आता प्रवासीही बसकडे येत नाही. सहा दिवसांत केवळ ६८४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर एसटी महामंडळ रसातळाला जाण्याची भीती आहे.

अपघाताची वाढली भीती

सुरक्षित प्रवासाठी एसटीकडे बघितले जाते. परंतु आता एसटी बंद असल्याने अनेक जण जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात. दोन दिवसांपूर्वी माहेरवरून नागपुकडे जाणाऱ्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यात पत्नी जागीच ठार झाली. एसटीचा पर्याय असता तर त्या महिलेचा प्राण वाचला असता. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर ते साकोलीपर्यंत दिवसभरातून शेकडो दुचाकी जीव मुठीत घेवून प्रवास करताना दिसतात.

टॅग्स :ST Strikeएसटी संपStrikeसंपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनstate transportएसटी