पंचायत समितीची वसाहत ‘जीर्णावस्थेत’
By Admin | Updated: January 8, 2015 22:50 IST2015-01-08T22:50:14+5:302015-01-08T22:50:14+5:30
येथील पंचायत समितीची वसाहत मागील विस वर्षापासून जीर्णवस्थेमध्ये आहे. याच वसाहतीमध्ये एका महिला खंडविकास अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.

पंचायत समितीची वसाहत ‘जीर्णावस्थेत’
लाखांदूर : येथील पंचायत समितीची वसाहत मागील विस वर्षापासून जीर्णवस्थेमध्ये आहे. याच वसाहतीमध्ये एका महिला खंडविकास अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तेव्हापासून या वसाहतीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.
या ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण न केल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देवून नव्याने वसाहत बांधकाम करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
लाखांदूर हे साकोली तालुक्यात होते. तेव्हाच येथे पंचायत समिती कार्यालयाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी १९६८ मध्ये तत्कालीन केंद्रीय समाजकल्याण मंत्री अशोक मेहता यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद अध्यक्ष कृ .दा. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. काही वर्षानंतर त.सा. २५ गट नं. ३४७ आराजी ३१.१४ हे. आर.मधील १० एकरामध्ये पंचायत समितीचा प्रशस्त कार्यालय सुरू करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आले व अधिकाऱ्यांसाठी वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. मागील विस वर्षाअगोदर या ठिकाणी अधिकारी राहत होते.
सन २००२ -२००३ या कालावधी मध्ये तत्कालीन खंडविकास अधिकारी श्रीमती बी.बी. शेख ह्या राहत असतांना पाहूण्या म्हणून आलेला त्यांच्या नंनद ह्या सर्पदंशाने मृत्यू पावला होत्या. तेव्हापासून त्याठिकाणी राहायला कुणीही तयार नव्हते.
सदर जागा ही जि.प. झुडपी जंगलात येत होती. त्याचे सदर वसाहतीच्या सभोवताल केरकचरा झाडे होते व सद्या स्थितीमध्ये सदर पडलेला वसाहती सभोवताल झाडे आहेत. तर सदर ठिकाणी चार बंगले हे भग्णावस्थेत आहेत. सदर वसाहती मोडकळीस आल्यामुळे ती जागा व इमारती निकामी आहेत.
पंचायत समितीचे अधिकारी हे सद्या भाड्याच्या घरात किंवा मोठया शहरातून ये -जा करतात. जिल्ह्यात सातही तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाकरिता एवढी जागा कुठेही उपलब्ध नाही एवढी जागा लाखांदूर पंचायत समितीला आहे. परंतु त्याचा उपयोग होत नसल्यामुळे तालुक्यातील जनतेचे कामे वेळेवर होत नाही व जनतेला ही याठिकाणी सोई सुविधा नाही. तर ४६ वर्षाची इमारत जीर्ण झाल्यामुळे याठिकाणी मागील वर्षी जि.प. भंडारा यांनी डागडूजीसाठी १३ लाख रुपये खर्च केले. परंतु नवीन बांधकाम करायला लोकप्रतिनिधी पुढे धजावू शकत नाही. त्यामुळे सदर पंचायत समितीची वसाहत दुरू स्त करू न राहण्यायोग्य करण्यात यावी व खाली जागेचा सदुपयोग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी मागणी तालुक्यातील जनतेनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)