शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

‘धान’ पेरले पण उगवलेच नाही

By admin | Updated: July 9, 2016 00:31 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक : अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकटविशाल रणदिवे अड्याळखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स व रायझिंग सन्स या कंपन्याचे हे बियाणे असल्याची माहिती समोर आली आहे. अड्याळ येथे सहा कृषी केंद्र आहेत. या कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने धान शेती करण्यासाठी बियाणांची खरेदी केली. पावसाळ्यापुर्वी शेतीची मशागत करून त्यात धान पऱ्ह्यांची पेरणी केली. आठवडा भरापुर्वी पेरणी केलेल्या धानाच्या बियाणांवर पावसानंतर उगवन होवून त्यातून धानाची रोवणी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तविली होती. मात्र बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतरही या बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. याबाबत त्यांनी खरेदी केलेल्या कृषी केंद्र संचालकांकडे संपर्क केला. यावर अनेकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर कृषी विभागाने सदर कंपन्यांचे बियाणे जप्त करून तपासणीकरीता पाठविण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देऊन त्यांची बोळवण करण्यात येत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे.कृषी केंद्र चालकांची धावपळवर्धा जिल्ह्यातील या कंपन्यांकडून खरेदी केलेले धान बियाणे शेतकऱ्यांना विकले. मात्र ते उगवले नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याने कृषी केंद्र चालकांची धावपळ सुरू झाली आहे. यातील अनेकांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे धान बियाणे दिले. तर काही संचालकांनी खरेदी केलेल्या धान बियाणाचे बिल परत मागवून त्यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटआठवड्याभरापुर्वी पेरलेले धान बियाणांची उगवण क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान या बियाणांसाठी हजारो रूपये खर्च करण्यात आले व पऱ्ह्यांचा कालावधीही निघून गेला आहे. परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कृषी अधिकारीच फसलेतालुक्यातील कृषी विभागात कार्यरत एका अधिकाऱ्याने त्यांच्या शेतात याच कंपनीचे धान बियाणे पेरले. यासाठी त्यांनी १५ बॅग खरेदी केल्यात. मात्र त्यांच्या शेताततही बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे कृषी विभागात कार्यरत असतानाही फसगत झाल्याने कुणाकडेही कैफीयत न मांडता बुक्यांचा मार सहन करीत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेले धान बियाणे उगविले नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष असून कंपनीविरूद्ध ओरड सुरू आहे. मात्र कुणाचीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही.-एन. एम. मेश्राम, कृषी पर्यवेक्षक, अड्याळ.कृषी केंद्र संचालकांवर विश्वास ठेवून धान बियाणांची खरेदी केली. मात्र ते उगविले नाही. त्यामुळे कृषी केंद्र संचालकाने किंवा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे परत करावे.-रविंद्र दशरथ गभने, शेतकरी अड्याळ.