शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
2
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
3
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
4
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
5
'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
6
आता १९ नव्हे, 'या' ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'! डोनाल्ड ट्रम्प कायदे आणखी कठोर करणार
7
Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू!
8
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
9
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
10
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
11
School Holiday: तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
12
भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
13
प्रभाग पुनर्रचनेला आव्हान, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं? 
14
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
15
पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 
16
घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
17
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार
18
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
19
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
20
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘धान’ पेरले पण उगवलेच नाही

By admin | Updated: July 9, 2016 00:31 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक : अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकटविशाल रणदिवे अड्याळखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स व रायझिंग सन्स या कंपन्याचे हे बियाणे असल्याची माहिती समोर आली आहे. अड्याळ येथे सहा कृषी केंद्र आहेत. या कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने धान शेती करण्यासाठी बियाणांची खरेदी केली. पावसाळ्यापुर्वी शेतीची मशागत करून त्यात धान पऱ्ह्यांची पेरणी केली. आठवडा भरापुर्वी पेरणी केलेल्या धानाच्या बियाणांवर पावसानंतर उगवन होवून त्यातून धानाची रोवणी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तविली होती. मात्र बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतरही या बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. याबाबत त्यांनी खरेदी केलेल्या कृषी केंद्र संचालकांकडे संपर्क केला. यावर अनेकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर कृषी विभागाने सदर कंपन्यांचे बियाणे जप्त करून तपासणीकरीता पाठविण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देऊन त्यांची बोळवण करण्यात येत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे.कृषी केंद्र चालकांची धावपळवर्धा जिल्ह्यातील या कंपन्यांकडून खरेदी केलेले धान बियाणे शेतकऱ्यांना विकले. मात्र ते उगवले नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याने कृषी केंद्र चालकांची धावपळ सुरू झाली आहे. यातील अनेकांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे धान बियाणे दिले. तर काही संचालकांनी खरेदी केलेल्या धान बियाणाचे बिल परत मागवून त्यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटआठवड्याभरापुर्वी पेरलेले धान बियाणांची उगवण क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान या बियाणांसाठी हजारो रूपये खर्च करण्यात आले व पऱ्ह्यांचा कालावधीही निघून गेला आहे. परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कृषी अधिकारीच फसलेतालुक्यातील कृषी विभागात कार्यरत एका अधिकाऱ्याने त्यांच्या शेतात याच कंपनीचे धान बियाणे पेरले. यासाठी त्यांनी १५ बॅग खरेदी केल्यात. मात्र त्यांच्या शेताततही बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे कृषी विभागात कार्यरत असतानाही फसगत झाल्याने कुणाकडेही कैफीयत न मांडता बुक्यांचा मार सहन करीत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेले धान बियाणे उगविले नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष असून कंपनीविरूद्ध ओरड सुरू आहे. मात्र कुणाचीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही.-एन. एम. मेश्राम, कृषी पर्यवेक्षक, अड्याळ.कृषी केंद्र संचालकांवर विश्वास ठेवून धान बियाणांची खरेदी केली. मात्र ते उगविले नाही. त्यामुळे कृषी केंद्र संचालकाने किंवा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे परत करावे.-रविंद्र दशरथ गभने, शेतकरी अड्याळ.