धान उत्पादक दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:30+5:30

यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.

Paddy growers in double jeopardy | धान उत्पादक दुहेरी संकटात

धान उत्पादक दुहेरी संकटात

ठळक मुद्देमदतीची अपेक्षा : परतीचा पाऊस आणि किडींचा प्रादुर्भाव, सर्वेक्षण अद्यापही सुरू नाही

न्यूज नेटवर्क
भंडारा : राबराब राबून पिकविलेला धान हातातोंडाशी आला असताना आता परतीचा पाऊस आणि किडींच्या प्रादूर्भावाने उद्ध्वस्त होत आहे. दुहेरी संकटाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आला असून पीक विम्यासोबत शासकीय मदतीची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन आहे. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, कन्हान आणि सुर नदीसोबत गोसेखुर्द व बावनथडी असे दोन मोठे प्रकल्प आहेत. परंतु अद्यापही नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळत नाही.
यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच अतीवृष्टी झाली. आता ऐन दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. शेतात कापलेल्या धानाचे फड आहेत. मात्र पावसाने कापलेला धान ओला होत आहे. या सर्व प्रकारात शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शासनाने शेतकºयांना पीक विम्यासोबतच शासकीय मदतीची घोषणा करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

वन्यप्राण्यांचा फटका
जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्यजीव शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. धानपिकात रानडुकरांनी धुमाकुळ घातल्याने उभे पीक आडवे होत आहे. यासोबतच भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. वनविभाग नुकसानभरपाई देत नसल्याने आणि शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.

Web Title: Paddy growers in double jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती