शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

धान उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:53 IST

ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

ठळक मुद्देढगाळ वातावरण : ओले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. दोन दिवसाच्या पावसाने ओले झालेले धान वाळविण्याचे प्रयत्न आता जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धानावर अवलंबून आहे. या वर्षी हंगामात एका पाण्याअभावी अनेकांचा धान हातचा गेला. बहुतांश शेतकºयांनी ओलीत करून धान पिकविला. घरी आलेला धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. परंतु तेथे बारदान्याअभावी खरेदी मंद असल्याने उघड्यावरच धान ठेवावा लागला. रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात शेतकºयांची हजारो पोती धान ओलेचिंब झाले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला आहे. आता ओला झालेला धान कुणी खरेदी करणार नाही म्हणून शेतकरी आधारभूत केंद्रावरून धान घरी नेण्याच्या तयारीत आहेत. आणण्यासाठी जेवढा खर्च लागला तेवढाच खर्च धान घरी नेण्यासाठी लागत आहे. हा धान उन्हात वाळवावा लागणार आहे. परंतु गत दहा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कधी निवडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी पोते फोडून धान घराच्या आवारात झाकून ठेवला आहे.ओला झालेला धान पाखर होण्याची भीती आहे. बेचव झालेल्या धानाला बाजारात किंमत येत नाही. तसेच भरडाईनंतर त्याच्या रंगातही बदल जाणवतो. तसेच हा धान अधिक दिवस साठवूनही ठेवता येत नाही. एकंदरीत सर्वच बाजूनी शेतकºयांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. धानासोबतच बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादूर्भाव वाढला आहे.अपुºया पावसाने धान उध्वस्त झाल्यावर शेतकºयांनी दुष्काळाची मागणी केली होती. परंतु शासनाने दुष्काळ घोषित केला नाही. भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश नव्हता. सुरुवातीला एका पाण्याने आणि आता अवकाळी पावसाने शेतकरी पूरता उध्वस्त झाला आहे. घेतलेले कर्ज कसे फेडावे याचीच चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना लागली आहे. पावसामुळे ओला झालेल्या धानाचे नुकसानभरपाई देण्याचीही मागणी पुढे येत आहे.आधारभूत केंद्रांवर बारदाण्याचा अभावआधारभूत केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी पणन महासंघाच्या वतीने बारदाना पुरविला जातो. या बारदाना पुरविण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रांवर बारदाना पुरविला जातो. परंतु धानाची मोठी आवक झाल्याने बारदाना अपुरा पडत आहे. काही ठिकाणी आलेला बारदाना अर्धा अधिक फाटका असल्याचे दिसून आले. अशा फाटक्या बारदान्यात धान भरावा कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच खरेदीची गती मंदावली. परिणामी शेतकºयांना आपला धान आधारभूत केंद्रात उघड्यावर ठेवावा लागला. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. बारदान्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी