प्रतिकूल हवामानाने धानपीक रोगग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:35+5:30
शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

प्रतिकूल हवामानाने धानपीक रोगग्रस्त
शेतकरी चिंतेत : कृषी अधिकारी शेतशिवारात, फवारणीच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. आता शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
दिवाळीपासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण कीडीला पोषक आहे. सद्यस्थितीत पालांदूर परिसरात उन्हाळी धानावर खोडकीड, करपाचा प्रादूर्भाव वाढला आहे. २०-२५ दिवसाच्या रोवणीला दोनवेळा फवारणी करूनही सुधारणा दिसत नाही. चुलबंध खोऱ्यात धानाची ५२३ हेक्टरवर लागवड झाली असून लाखनी तालुक्यात १७५२ हेक्टर रोवणी झाली आहे. एकट्या पालांदूरात हे क्षेत्र ४७ हेक्टर आहे. भाजीपाल्याचेही मोठे पीक या परिसरात घेतले जाते. धानासोबतच वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे. बाजारात धानाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची भीस्त उन्हाळी धानावर आहे. परंतु प्रतिकुल हवामान शेतकºयांना चिंतेत टाकत आहे.
शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचले आहे. कृषी मंडळ अधिकारी गणपती पांडेगावकर म्हणाले, धानाचे पीक वेळीच निंदन व खुरपन करू घ्यावे, अपेक्षित खताच्या मात्रा द्याव्या, कृषी सल्ल्यानुसारच खत टाकावे, कृषी निविष्ठांचे पक्के बिल द्यावे, असे आवाहन केले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.
तापमानात अनपेक्षित बदल
दिवस व रात्रीच्या तापमानात अनपेक्षित बदल जाणवत आहे. धानाला उष्ण हवामानाची गरज आहे. मात्र दुपारी उन्ह आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. खोडकीडीचेही आक्रमण झाले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी पुढे सरसावले आहे.
शेतकºयांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी करावी. धानात खूप पाणी साठवून ठेवू नये, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
-पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी लाखनी.