शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

तलावाच्या जिल्ह्यात सिंचनाअभावी भातशेती झाली कोरडवाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:51 AM

पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्दे८० टक्के विहिरी पडल्या कोरड्या। धानाचे पऱ्हे जगवणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौरास) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी उन्हाळ्यामध्ये हिरवेगाव दिसणारे शेत दिसेनासे झाले असून भात शेतकऱ्यांना धानाचे पऱ्हे (नर्सरी) जगवणे कठीण झाले आहे.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. तीच नाळ चौरास भागाशी जुळली आहे. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प झाला आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून चौरास भागात विहिरीला पाणी पुरवठा होणारा प्रवाह धरणाच्या पाळीचे बांधकाम करण्यात आले. येथूनच चौरास भागातील शेतीला घरघर लागली. कालांतराने नदीचा प्रवाह बदलला गेला. तरीही जमीनीच्या आतमध्ये वैनगंगा नदीच्या भूमिगत प्रवाह चौरास परिसरात सुरु होता.चौरास भागात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होता. त्यामुळे शेतकरी जेथे विहिर खोदेल तेथे जलसाठा मिळत होता व कृषी पंप चालत होते. सर्वात जास्त विद्युत पंप आता ही चौरास भागात आहेत. पण आता बंद पडलेले आहेत. यापुर्वी खरीप धान, रबी डाळ वर्गीय पिके, रबी धान या तिन्ही फसली शेतकरी हमखास घेत होता. मात्र आता त्याला एकाही पिकाची हमी राहिलेली नाही.धरणामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही व प्रकल्प पूर्ण झाला असला तरी उजव्या व डाव्या कालवाच्या पाणी वाहून नेणाऱ्या वितरीका पूर्ण झाल्या नाहीत. या कालव्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणे दुर्लक्षीत झाले आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासाठी चौरास भागातून २२ किमी लांबीचा डावा कालवा तयार करण्यात आला. शेतकरी दरवर्षी या कालव्यातून पाणी मिळेल म्हणून वाट पाहात आहेत. मात्र धरणाच्या वितरीकेची कामे सुरु होतात. पण पूर्ण ती पूर्ण केली जात नाही. दिवसेंदिवस कालव्याच्या रकमेत चौपटीने वाढ होत असल्याचे सांगण्यात येतेबळीराजाच्या चिंतेत वाढ, संसारासाठी उसनवारचौरास भागात असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाअभावी निसर्गाचा पाण्याची आवश्यकता आहे. असे असताना मृग नक्षत्र लोटूनही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन शेती कसण्यासाठी उसनवार रक्कम घेत आहेत.

टॅग्स :agricultureशेती