शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मशागतीला वेग पण शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:15 IST

अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे.

ठळक मुद्देरोहिणी नक्षत्र गेले कोरडे : मृगधारा झेलण्याची धरतीला लागली आस

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे. मृगधारा वेळेवर बरसल्या तर शेतशिवारात पऱ्हे टाकण्याची लगबग वाढणार आहे. मात्र हवामान खात्याने मान्सून लांबणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी मात्र सध्या चिंतेत दिसत आहे. मशागतीच्या कामांना वेग आला असला तरी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शनिवारी लागणाºया मृग नक्षत्रावर सर्वांच्या आशा आहेत.भंडारा जिल्हा भातासाठी प्रसिध्द आहे. या पिकाला मुबलक पावसाची आवश्यकता असते. रोहिणी नक्षत्र पुर्णत: कोरडे गेले आहे. जिल्ह्यात १ ते ६ जूनपर्यंत साधारणत: ४९.१ मिमी पावसाची नोंद केली जाते. परंतु आतापर्यंत पावसाची सरही कोसळली नाही. दररोज सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होतात आणि वाºयाच्या वेगासोबत निघून जातात. आता ८ जूनपासून मृग नक्षत्र लागत आहे. मृग नक्षत्रातील पाऊस पिकासाठी पोषक मानला जातो. या काळात जोरदार पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता मृगात पाऊस दगा देत असल्याचे दिसत आहे.दरवर्षीच्या दृष्काळ झेलत शेतकरी गत काही दिवसांपासून ४६ अंश तापमानातही शेतात मशागतीचे कामे करीत आहे. शेतातील धुरे पेटविणे, धुऱ्यावर माती टाकणे, शेतातील नागरलेले शेत सपाट करणे, कुळवाची फाळी टाकणे अशा कामात शेतकरी व्यस्त आहे. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे याच पिकावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबुन असते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी भात शेतीची कामे पुर्णत्वास गेली असून ओलीताची सोय असलेल्या पºहेही टाकण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये तसेच लागवडही करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र काही शेतकरी ओलीताच्या भरवशावर पºहे टाकत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी बाजारात बियाण्यांची चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे.भात शेतीचे क्षेत्र घटतेभंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मात्र अलिकडे भात शेतीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसत आहे. शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे. भातातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, बियाण्यांच्या किंमती आणि शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धानाला मिळणारा कमी भाव यामुळे आता शेतकरी भाताऐवजी पर्यायी पिकाचा विचार करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी आता तुर, सोयाबीन पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी