शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीला वेग पण शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:15 IST

अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे.

ठळक मुद्देरोहिणी नक्षत्र गेले कोरडे : मृगधारा झेलण्याची धरतीला लागली आस

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे. मृगधारा वेळेवर बरसल्या तर शेतशिवारात पऱ्हे टाकण्याची लगबग वाढणार आहे. मात्र हवामान खात्याने मान्सून लांबणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी मात्र सध्या चिंतेत दिसत आहे. मशागतीच्या कामांना वेग आला असला तरी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शनिवारी लागणाºया मृग नक्षत्रावर सर्वांच्या आशा आहेत.भंडारा जिल्हा भातासाठी प्रसिध्द आहे. या पिकाला मुबलक पावसाची आवश्यकता असते. रोहिणी नक्षत्र पुर्णत: कोरडे गेले आहे. जिल्ह्यात १ ते ६ जूनपर्यंत साधारणत: ४९.१ मिमी पावसाची नोंद केली जाते. परंतु आतापर्यंत पावसाची सरही कोसळली नाही. दररोज सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होतात आणि वाºयाच्या वेगासोबत निघून जातात. आता ८ जूनपासून मृग नक्षत्र लागत आहे. मृग नक्षत्रातील पाऊस पिकासाठी पोषक मानला जातो. या काळात जोरदार पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता मृगात पाऊस दगा देत असल्याचे दिसत आहे.दरवर्षीच्या दृष्काळ झेलत शेतकरी गत काही दिवसांपासून ४६ अंश तापमानातही शेतात मशागतीचे कामे करीत आहे. शेतातील धुरे पेटविणे, धुऱ्यावर माती टाकणे, शेतातील नागरलेले शेत सपाट करणे, कुळवाची फाळी टाकणे अशा कामात शेतकरी व्यस्त आहे. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे याच पिकावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबुन असते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी भात शेतीची कामे पुर्णत्वास गेली असून ओलीताची सोय असलेल्या पºहेही टाकण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये तसेच लागवडही करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र काही शेतकरी ओलीताच्या भरवशावर पºहे टाकत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी बाजारात बियाण्यांची चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे.भात शेतीचे क्षेत्र घटतेभंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मात्र अलिकडे भात शेतीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसत आहे. शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे. भातातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, बियाण्यांच्या किंमती आणि शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धानाला मिळणारा कमी भाव यामुळे आता शेतकरी भाताऐवजी पर्यायी पिकाचा विचार करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी आता तुर, सोयाबीन पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी