शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

मशागतीला वेग पण शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:15 IST

अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे.

ठळक मुद्देरोहिणी नक्षत्र गेले कोरडे : मृगधारा झेलण्याची धरतीला लागली आस

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे. मृगधारा वेळेवर बरसल्या तर शेतशिवारात पऱ्हे टाकण्याची लगबग वाढणार आहे. मात्र हवामान खात्याने मान्सून लांबणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी मात्र सध्या चिंतेत दिसत आहे. मशागतीच्या कामांना वेग आला असला तरी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शनिवारी लागणाºया मृग नक्षत्रावर सर्वांच्या आशा आहेत.भंडारा जिल्हा भातासाठी प्रसिध्द आहे. या पिकाला मुबलक पावसाची आवश्यकता असते. रोहिणी नक्षत्र पुर्णत: कोरडे गेले आहे. जिल्ह्यात १ ते ६ जूनपर्यंत साधारणत: ४९.१ मिमी पावसाची नोंद केली जाते. परंतु आतापर्यंत पावसाची सरही कोसळली नाही. दररोज सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होतात आणि वाºयाच्या वेगासोबत निघून जातात. आता ८ जूनपासून मृग नक्षत्र लागत आहे. मृग नक्षत्रातील पाऊस पिकासाठी पोषक मानला जातो. या काळात जोरदार पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता मृगात पाऊस दगा देत असल्याचे दिसत आहे.दरवर्षीच्या दृष्काळ झेलत शेतकरी गत काही दिवसांपासून ४६ अंश तापमानातही शेतात मशागतीचे कामे करीत आहे. शेतातील धुरे पेटविणे, धुऱ्यावर माती टाकणे, शेतातील नागरलेले शेत सपाट करणे, कुळवाची फाळी टाकणे अशा कामात शेतकरी व्यस्त आहे. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे याच पिकावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबुन असते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी भात शेतीची कामे पुर्णत्वास गेली असून ओलीताची सोय असलेल्या पºहेही टाकण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये तसेच लागवडही करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र काही शेतकरी ओलीताच्या भरवशावर पºहे टाकत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी बाजारात बियाण्यांची चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे.भात शेतीचे क्षेत्र घटतेभंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मात्र अलिकडे भात शेतीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसत आहे. शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे. भातातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, बियाण्यांच्या किंमती आणि शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धानाला मिळणारा कमी भाव यामुळे आता शेतकरी भाताऐवजी पर्यायी पिकाचा विचार करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी आता तुर, सोयाबीन पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी