शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अतिपावसाने धानाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग खरीप हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यामध्ये उच्च प्रतीच्या वाणाच्या धानपिकाला अधिक पाण्याची गरज असते. उच्चप्रतीचे धान पीक तीन महिन्यानंतर कापणीसाठी येतील. या धानाच्या उत्पादनासाठी अधिक दिवसांचा कालावधी लागतो तर साधारण प्रतीच्या धानाला कमी दिवसांचा कालावधी लागत असतो.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : साधारण प्रतिचे धान पीक लोंबीवर, पिकांवर अळींचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने यावर्षी धान पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्यस्थितीत साधारण प्रतिचे धान पीक लोंबीवर असून पावसामुळे सदर पीक धोक्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग खरीप हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यामध्ये उच्च प्रतीच्या वाणाच्या धानपिकाला अधिक पाण्याची गरज असते. उच्चप्रतीचे धान पीक तीन महिन्यानंतर कापणीसाठी येतील. या धानाच्या उत्पादनासाठी अधिक दिवसांचा कालावधी लागतो तर साधारण प्रतीच्या धानाला कमी दिवसांचा कालावधी लागत असतो. सध्यस्थितीत हलक्या प्रतीचे धान पीक लोंबीवर आहेत. मात्र सुरू असलेल्या संततधार पावसाने लोंबीवर आलेला धानाचा फुलोरा पडत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असून तांदळाची प्रत खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. भंडारा जिल्ह्यात जवळपास एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने रोवणीला उशीर झाला होता. दुबार, तिबार पेरणीनंतर १५ आॅगस्टदरम्यान पावसाने हजेरी लावली. या पावसाने रोवणीला वेग आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ९५ टक्के रोवणी आटोपली. त्यानंतर मात्र जिल्ह्यात संततधार पावसामुळे धान पीक पाण्याखाली आले आहे. अतिपावसाने धान पिकाची वाढ खुंटली आहे. कीडींचा प्रादुर्भाव वाढल्याने संकट आले आहे.कीटकनाशके अनुदानावर देण्याची मागणीधानपिकावर खोडकीडीसह मावाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकºयांच्या समस्येत भर झाली आहे. महागडी कीटकनाशके विकत घेवून शेतकरी पीक वाचविण्यासाठी आटापिटा करीत आहे. महागडी औषध खरेदी करण्याची कुवत अनेक शेतकºयांकडे नसल्याने कर्ज काढून औषधी खरेदी करीत आहेत. कृषी विभागाने कीटकनाशके अनुदानावर मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती