अतिवृष्टीत घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 00:33 IST2015-06-25T00:33:33+5:302015-06-25T00:33:33+5:30
अतिवृष्टीमुळे एका इसमाचे घर कोसळल्याची घटना नेहरु वॉर्ड येथे घडली.

अतिवृष्टीत घर कोसळले
वरठी : अतिवृष्टीमुळे एका इसमाचे घर कोसळल्याची घटना नेहरु वॉर्ड येथे घडली. दि. २१ रोजी आलेल्या पावसामुळे धनसिंग लेंडे यांचे राहते घर कोसळल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले आहे. यात जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तलाठ्यांमार्फत पंचनामा करण्यात आलेला नाही, असेही लेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून तत्काळ शासकीय मदत द्यावी, या आशयाची मागणी लेंडे यांनी सरपंचांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)