धान पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:04+5:30
वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

धान पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे धान पीकावर तुडतुडा रोगाचा उपद्रव वाढत असून शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावर्षी सुरुवातीला दोन महिने पावसाचा खंड आणि नंतर सातत्याने संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात आमुलाग्र बदल झाला आहे. त्याचा परिणाम धान पिकावर होत असून अनेक रोगकिडींसह तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत असून यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बांध्यातील साठलेले पाणी काढून देवून सकाळच्या सत्रामध्ये उन्हापूर्वी फवारणी करावी.
फवारणीपूर्वी धानाच्या बुंद्याजवळ बारिक निरीक्षण करुन ५ ते १० तुडतुडे आढळल्यास नुकसानीची पातळी वाढली आहे. हे समजून त्यासाठी प्रथम मॅटारायझिंग अॅनिसोपडी जैविक बुरशीनाशक १ किलो प्रति एकर या प्रमाणात बांध्यामध्ये वापरुन फवारणी करावी. रासायनिक शिफारशीप्रमाणे तुडतुडा नियंत्रणासाठी ईमिडाक्लोरोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली किंवा ट्रायझोफास ४० एलजी प्रवाही २० मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करतांना धानाच्या बुंध्यापर्यंत जाईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी दिपक अहेर, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ओळख तुडतुड्याची
तुडतुड्याचे हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, पांढºया पाढीचे तुडतुडे अशा तीन प्रकारचा किडांचा जीवनक्रम असून त्यामध्ये हिरवे तुडतुडे पाण्यातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. तर तपकिरी तुडतुडे प्रौढ झाल्याने झाड्यांच्या बुंध्यामधून सतत रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाडे निस्तेज होतात तर पांढºया पाढीच्या तुडतुड्याने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे चुडाच्या बाहेरील पाने करपलेली दिसतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय वेळीच करणे गरजेचे आहे. यामध्ये धान रोपाच्या लावणीपासून पट्टा पध्दत करणे गरजेचे आहे.