शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

१७३१ गुन्ह्यांपैकी १५४३ गुन्ह्यांचा केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:42 IST

जिल्हा पोलिसांची कारवाई : ९ धोकादायक व्यक्तींना स्थानबद्ध, एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावण्यात भंडारापोलिस यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १७३१ गुन्ह्यांपैकी १५४३ गुन्ह्यांची उकल करून ३६०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एमपीडीए कायद्यानुसार जिल्ह्यातील ९ धोकादायक व्यक्तींना एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई सन २०२४ मधील जून महिन्यापर्यंतची आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एक गुन्हेगारी टोळी तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ आणि ५७ नुसार भंडारा जिल्ह्यातील ४३ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते जून २०२४ मध्ये दाखल ६ गुन्ह्यांपैकी सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे ९ गुन्हे दाखल असून, या सर्व गुन्ह्यांची उकल भंडारा पोलिसांनी केली आहे.

भंडारा पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्ताविषयक ३९८ गुन्हे दाखल झाले. यापैकी २६६ प्रकरणांचा छडा लावण्यात आला. याची टक्केवारी ६७ इतकी आहे. पोलिस दीदी, बीट मार्शल आणि दामिनी पथकाकडून नियमितपणे करण्यात येणाऱ्या पेट्रोलिंगमुळे अत्याचारासंबंधाने दाखल गुन्ह्यांमध्येही घट झाल्याचे दिसून येते. चालू वर्षात जूनअखेर अतिप्रसंगाचे दाखल ३६ गुन्हे पोलिसांनी तपासात उघड केले आहेत. विनयभंगाचे दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५२ गुन्ह्यांचा तपास करून महिलांना न्याय मिळवून दिला आहे. महिला, मुली आणि लहान मुलांचे अपहरण आणि अपनयन याबाबत ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४२ गुन्ह्यांचा उलगडा भंडारा पोलिसांनी केला आहे.

एनडीपीएस कायद्यांतर्गत २९ कारवायाभंडारा पोलिसांनी जून २०२४ पर्यंत लपूनछपून सुरू असलेल्या जुगाराच्या २७२ ठिकाणांवर आणि दारूच्या १०९६ ठिकाणांवर धाड घातली. अवैध हत्यारासंबंधाने ११ तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत २९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये ४४ किलो ६७१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४ हजार ९३९ वाहनचालकांवर कारवाई करून २४ लाख ७७ हजार ६०० रुपये दंडापैकी ६ लाख ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर ५२८ गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.

"जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात जिल्हा पोलिस प्रशासनाला मोठे यश लाभले आहे. यात १७ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा सहभाग आहे."-लोहित मतानी, पोलिस अधीक्षक, भंडारा 

टॅग्स :bhandara-acभंडाराPoliceपोलिस