प्रकल्पग्रस्तांचे न्याय मागण्यांसाठी निदर्शने
By Admin | Updated: April 24, 2017 00:54 IST2017-04-24T00:54:55+5:302017-04-24T00:54:55+5:30
विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचे भूमीपूजन माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते २२ एप्रिल १९८८ ला झाले.

प्रकल्पग्रस्तांचे न्याय मागण्यांसाठी निदर्शने
गोसीखुर्द धरणस्थळी आंदोलन : मेणबत्ती पेटवून केली भूमिपूजनाची आठवण
पवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचे भूमीपूजन माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते २२ एप्रिल १९८८ ला झाले. या भूमीपूजनाला २९ वर्षे पुर्ण झालीत. या भूमीपूजनाची सरकार व अधिकाऱ्यांना आठवण करुन देण्यासाठी व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे २२ एप्रिलला गोसीखुर्द धरणाच्या भूमीपूजन स्थळी निदर्शने करुन मेणबत्ती पेटविण्यात आली.
गोसीखुर्द धरणाला आज २९ वर्ष पुर्ण झाले. पण ना धरण पुर्ण झाले ना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले. पण धरणाची किंमत कितीतरी पटीने वाढली आहे. प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी लढत आहेत.
याचे अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. पण अजुनही समस्या प्रलंबीत आहेत. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे मेणबत्ती पेटविण्यात आली.
सायंकाळी ६ वाजता पाथरी, गोसेबुज, गोसीखुर्द, मेंढा, चिचखेडा, नवेगाव आदी गावातील प्रकल्पग्रस्त भुमीपूजन स्थळी जमा झाले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी घोषणाबाजी, नारेबाजी करुन वातावरण तापविले होते. ही नारेबाजी दिड तासांपर्यंत सुरु होती. संघर्ष समितीचे सयोजक विकास भोंगाडे, वामन भोयर, समिक्षा गणवीर, शंकर माटे, नंदू कुर्झेकर, गुणवंत मेश्राम आदीनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली. याचवेळेस प्रकल्पग्रस्तांनी भूमीपूजन स्थळी शेकडो मेणबत्ती पेटवून भूमीपूजनाच्या आठवणींना उजाळा करुन दिला.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याचे निवेदन प्रशासनातर्फे पवनीचे तहसिलदार सुखदेव वासनीक, धरण विभागातर्फे कार्यकारी अभियंता बावनगडे व पोलीस विभागातर्फे पोलिस उपनिरीक्षक सुहास चौधरी यांनी स्विकारुन शासनकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी विलास भोंगाडे, प्रकाश मेश्राम, वसंता आगारे, श्रीहरी आगरे, वामन भोयर, समिक्षा गणविर, गुलाब मेश्राम, विलास ठाकरे, सोमेश्वर भुरे, शंकर माटे, नंदू कुर्झेकर, झिबल गणवीर, माणिक दुबे, भिमराव भिमरे, रमेश भोयर, दादा आगरे, धर्मराज भुरे, आसाराम मेश्राम, गणेश आगरे, ढेकल मेश्राम, किशोर समरीत, विश्वनाथ वाडीभस्मे दिगांबर कुर्झेकर, प्यारेलाल मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)