शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

जिल्ह्यात तब्बल ८३८ लोकांमागे एकच पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST

भंडारा : जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. मात्र, एवढी लोकसंख्या असताना त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची ...

भंडारा : जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. मात्र, एवढी लोकसंख्या असताना त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे दिसून येते. १२ लाख ३३४ एवढ्या लोकांचा भार केवळ १४३३ पोलिसांवर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकर राबवण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारासह वेगवेगळ्या गुन्हेगारीला थोपविण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलापुढे आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात १४३३ पोलीस कर्मचारी, १११ पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. बारा लाख लोकसंख्या असताना ८३८ लोकांची सुरक्षितता केवळ एकाच पोलिसावर आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे हळूहळू सर्वच कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली असल्याने मोर्चे, निवडणुका, आंदोलने यांच्यासह अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण अधिक पडत आहे. मात्र, असे असले तरी मंत्र्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले असल्याने सुरक्षिततेसाठी पोलिसांना नेहमीच दक्ष राहावे लागत आहे.

बॉक्स

ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान

जिल्ह्यात छोट्या-मोठ्या गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी असले, तरी दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यस्तरावर ऑनलाइन पैसे काढल्याच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लॉटरी लागली आहे, अल्पावधीत कर्ज मंजूर करून देतो. मी बँकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा. तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत, अशी विविध कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी हे वाढत्या लोकसंख्येपुढे कमी पडत आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे.

बॉक्स

शेतशिवारातील चोरीच्या घटनांच्या प्रमाणात वाढ

जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास न झाल्याने शेती हाच अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले मोटारपंप तसेच केबल वायर, पॅकहाउस बांधकाम केलेल्या साहित्याची चोरी तसेच शेळीपालन असलेल्या ठिकाणी बोकडचोरी केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात या वर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरापेक्षाही ग्रामीण भागातील शेतशिवारातून कृषीपंपचोरी होण्याच्या घटना वाढल्या असल्याने त्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या १२,००,३३४

जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी १४३३