शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

धान्य साहित्यांचा पुरवठा करा तरच शालेय पोषण आहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:43 IST

सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन: मुख्याध्यापक संघाचा निर्णय

आॅनलाईन लोकमतभंडारा : सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल. असे जर करण्यात आले नाही तर १ डिसेंबर पासून माध्यान्ह भोजन योजना बंद करण्याचा निर्णय भंडारा जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदनही देण्यात आले.शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार देण्यासाठी धान्याची माल पुरवठादारांसोबत अजूनही करारनामा केला गेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आपल्या वेतनातून धान्यादी माल खरेदी करावे लागत आहे. ज्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी मालाची खरेदी केली त्यांची बिले मुख्याध्यापक संघानी आवाज उचलला तेव्हा बिले देण्याची कारवाई केली गेली आहे. पंधरा दिवसात खरेदी केलेल्या धान्यादी मालाची रक्कम देवू म्हणणाºया प्रशासनाने तीन महिने लावले. तेही संघटनांनी ओरड केली तेव्हा ही एक प्रकारची फसवणूकच केली गेली आहे. आता आपल्या वेतनातून एक दमडीही धान्यादी माल खरेदी करण्यासाठी खर्च करायचा नाही असा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. शाळांना तांदळाचा तेवढा पुरवठा केला जात आहे. पण, धान्यादी माल दिले जात नाही. शासनानी करारनामा केला नाही त्याची शिक्षा मुख्याध्यापकांनी का सोसायची असा प्रश्न विचारला जात आहे. उधारीवर धान्य कसा खरेदी करायचा. शाळांनी धान्यादी माल खरेदी मुळे शाळांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होवू लागली नाही. याचा मानसिक त्रास शाळा मुख्याध्यापकांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद केल्याशिवाय पर्यायच उरला नाही. तांदळासह धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा यांना मुख्याध्यापक संघाने निवेदन सादर केले.धान्यादी मालाचा पुरवठा न झाल्यास १ डिसेंबर पासून भंडारा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद करण्याचा इशारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविण्यात आले नाही. या कारणास्तव मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येवू नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.एन. टिचकुले, विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी, पी.डी. मुंगमोडे, ए.पी. डोमळे, उमेश पडोळे, सी.एम. यावलकर, डी.एफ. काळे, एच.ए. सिंगनजुडे, प्रदीप रंगारी, अनमोल देशपांडे, राजकुमार बांते, गोपाल बुरडे, व्ही.एच. बांते, राजू भोयर, ए.बी. गोडबोले, एल.जी. राणे, मार्तंड कापगते, कुंदा बोदलकर, एच.के. भुरे, एम.बी. वंजारी, एम.एम. किटे, आर.व्ही. भेंडारकर, एम.एम. मेश्राम, एन.डी. बिल्लोरे, एस.ए. कुकडे, व्ही.डी. नंदनवार आदी उपस्थित होते.