शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

धान्य साहित्यांचा पुरवठा करा तरच शालेय पोषण आहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:43 IST

सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन: मुख्याध्यापक संघाचा निर्णय

आॅनलाईन लोकमतभंडारा : सध्या शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळच दिले जात आहे. सोबत धान्यादी मालाचा साठा पुरवावा तरच माध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्यात येईल. असे जर करण्यात आले नाही तर १ डिसेंबर पासून माध्यान्ह भोजन योजना बंद करण्याचा निर्णय भंडारा जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदनही देण्यात आले.शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार देण्यासाठी धान्याची माल पुरवठादारांसोबत अजूनही करारनामा केला गेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आपल्या वेतनातून धान्यादी माल खरेदी करावे लागत आहे. ज्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी धान्यादी मालाची खरेदी केली त्यांची बिले मुख्याध्यापक संघानी आवाज उचलला तेव्हा बिले देण्याची कारवाई केली गेली आहे. पंधरा दिवसात खरेदी केलेल्या धान्यादी मालाची रक्कम देवू म्हणणाºया प्रशासनाने तीन महिने लावले. तेही संघटनांनी ओरड केली तेव्हा ही एक प्रकारची फसवणूकच केली गेली आहे. आता आपल्या वेतनातून एक दमडीही धान्यादी माल खरेदी करण्यासाठी खर्च करायचा नाही असा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. शाळांना तांदळाचा तेवढा पुरवठा केला जात आहे. पण, धान्यादी माल दिले जात नाही. शासनानी करारनामा केला नाही त्याची शिक्षा मुख्याध्यापकांनी का सोसायची असा प्रश्न विचारला जात आहे. उधारीवर धान्य कसा खरेदी करायचा. शाळांनी धान्यादी माल खरेदी मुळे शाळांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होवू लागली नाही. याचा मानसिक त्रास शाळा मुख्याध्यापकांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद केल्याशिवाय पर्यायच उरला नाही. तांदळासह धान्यादी मालाचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा यांना मुख्याध्यापक संघाने निवेदन सादर केले.धान्यादी मालाचा पुरवठा न झाल्यास १ डिसेंबर पासून भंडारा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविणे बंद करण्याचा इशारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजविण्यात आले नाही. या कारणास्तव मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येवू नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.एन. टिचकुले, विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी, पी.डी. मुंगमोडे, ए.पी. डोमळे, उमेश पडोळे, सी.एम. यावलकर, डी.एफ. काळे, एच.ए. सिंगनजुडे, प्रदीप रंगारी, अनमोल देशपांडे, राजकुमार बांते, गोपाल बुरडे, व्ही.एच. बांते, राजू भोयर, ए.बी. गोडबोले, एल.जी. राणे, मार्तंड कापगते, कुंदा बोदलकर, एच.के. भुरे, एम.बी. वंजारी, एम.एम. किटे, आर.व्ही. भेंडारकर, एम.एम. मेश्राम, एन.डी. बिल्लोरे, एस.ए. कुकडे, व्ही.डी. नंदनवार आदी उपस्थित होते.