शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी दमदार कोसळणाऱ्या पावसाने यंदा भंडारा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून केवळ रिमझिम श्रावण सरी तेवढ्या बरसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस कोसळला आहे. जोरदार पाऊस बरसत नसल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यता असून प्रकल्पात ही निम्माच जलसंचय झाला आहे. भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. शेकडो घरांना ही फटका बसला होता. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून तर केवळ एक दोन दिवसा आड रिमझिम श्रावण सरी बरसत आहे. जिल्ह्यात धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे वातावरणात प्रचंड उकाडा यामुळे धान पीक सुकण्याची स्थिती आहे. अनेक बांध्यांमध्ये पाणी आटले असून शेतकरी सिंचनासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६८२ मिमी, मोहाडी १००५.२ मिमी, तुमसर ७२२.७ मिमी, पवनी ७१६.१ मिमी, साकोली ८१३.५ मिमी, लाखांदूर ७४३.६ मिमी, लाखनी ८७७.० मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७९४.३ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होते. परंतु श्रावणसरी काही काळ बरसतात आणि निघून जातात. जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.

शेतशिवारात घुमतो इंजिनचा आवाज - पावसाने दडी मारल्याने धान पीक जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता डिझेल पंप लावले आहे. त्यामुळे शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज घुमत आहे. डिझेलचे दर ९७ रुपये प्रति लिटर असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पाऊस केव्हा बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊस