शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी दमदार कोसळणाऱ्या पावसाने यंदा भंडारा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून केवळ रिमझिम श्रावण सरी तेवढ्या बरसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस कोसळला आहे. जोरदार पाऊस बरसत नसल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यता असून प्रकल्पात ही निम्माच जलसंचय झाला आहे. भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. शेकडो घरांना ही फटका बसला होता. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून तर केवळ एक दोन दिवसा आड रिमझिम श्रावण सरी बरसत आहे. जिल्ह्यात धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे वातावरणात प्रचंड उकाडा यामुळे धान पीक सुकण्याची स्थिती आहे. अनेक बांध्यांमध्ये पाणी आटले असून शेतकरी सिंचनासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६८२ मिमी, मोहाडी १००५.२ मिमी, तुमसर ७२२.७ मिमी, पवनी ७१६.१ मिमी, साकोली ८१३.५ मिमी, लाखांदूर ७४३.६ मिमी, लाखनी ८७७.० मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७९४.३ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होते. परंतु श्रावणसरी काही काळ बरसतात आणि निघून जातात. जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.

शेतशिवारात घुमतो इंजिनचा आवाज - पावसाने दडी मारल्याने धान पीक जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता डिझेल पंप लावले आहे. त्यामुळे शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज घुमत आहे. डिझेलचे दर ९७ रुपये प्रति लिटर असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पाऊस केव्हा बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊस