शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देकीडींचा प्रादुर्भाव : शेतकरी संकटात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणतात, प्रादुर्भाव केवळ भंडारा तालुक्यातच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लक्ष हेक्टर क्षेत्रात गादमाशी, खोडकिडा तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून उपाययोजनेसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. २० दिवसानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्यात धडाक्याने रोवणीला प्रारंभ झाला. धान पिकाला पोषक असे वातावरण असल्यामुळे धान डौलाने उभे होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कधी ढगाळ वातावरणात तर कधी दमदार पावसाची हजेरी यामुळे डौलाने उभे असलेले धानपीक धोक्यात आले. वातावरण बदलाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी तर धानपिक नष्ट झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यामध्ये गादमाशी, खोडकिडा व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्यास जिल्हा कृषी विभाग उदासिन दिसून येत आहेत. केवळ कागदावरच उपाययोजना न ठेवता प्रत्यक्षात शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.अनुदानावर कीटकनाशक औषधींचे वितरण कराभंडारा जिल्ह्याला गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोठ्या आशेने शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षीही शेतकरी संकटात सापडला आहे. धानपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव आहे. किटकनाशके महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही. शासनाने गरजू शेतकऱ्यांना अनुदानावर किटकनाशक औषधींचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो, यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्र वगळता कोणत्याही तालुक्यात किडींचा प्रादुर्भाव नाही. सध्या स्थितीत १४८ लिटर किटकनाशक औषधी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. पुन्हा औषधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून लवकरच प्राप्त होणार आहे. किडींवर उपाययोजना करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.- हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :agricultureशेती