शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भेंडीचे भरघोस उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.

ठळक मुद्देभाव मात्र अत्यल्प : लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम, भेंडी उत्पादकांना भाववाढीची आशा

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचा शेतकरी, बळीराजा स्वत: पिकवित इतरांना शुद्ध ताजा भाजीपाला पुरवीत आहे. मात्र कोरोणाच्या संकटात सदाबहार असलेला शेतकरी भाजीपाल्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने सुमार संकटात सापडला आहे. पडलेल्या भावाने विक्री खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी आज उद्या भाव वाढण्याच्या आशेने आपले बाग मात्र नुकसान सहन करीत सांभाळीत आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.जिल्ह्याच्या मंडीत नेण्याकरिता साधन अपुरी असून दराचा विचार करता परवडणारे नाही, त्यामुळे करावे काय या विवंचनेत स्थानिक ठिकाणीच गावोगावी सायकल, मोटारसायकल, हातठेले, डोक्यावरून माल वाहतूक करीत भाजीपाला विकणे सुरू आहे. भेंडीला सहा रुपये किलो असा दर मिळत असल्याने शेतकºयाला नुकसान सहन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. वांगे केवळ दोन रुपये ते चार रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.स्थानिकच्या मजुरांना हाताशी धरून लॉकडाऊनच्या संकटात उन्ह व पावसाची काळजी घेत अगदी पहाटेपासूनच शेतकरी मजुरांसोबत बांधावर हजेरी लावीत आहे. संकटात असलेल्या उत्पादकांना मदतीची अपेक्षा आहे.भेंडी पीक उत्पादनाला परवडणारे असून एक दिवस आड तोडा करावा लागत असतो. त्यामुळे भेंडीचे पीक परवडणारे आहे. मात्र भेंडीला किमान १० रुपयांच्यावर भाव असणे अपेक्षित आहे. प्रतिकिलो उत्पादन खर्च सात रुपये किलो एवढा अपेक्षित आहे. सव्वा एकरात भेंडीचे जोमदार पीक असून उत्पादनही एकदम चांगले आहे. पण कोरोनाच्या सावटात आठवडी बाजार बंद असल्याने भेडी विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.-घनश्याम भेदे, भेंडी उत्पादक, पालांदूर.दीड एकरात भेंडी व चवडी लागवड केली असून माल, भाजीपाला निघण्यास सुरुवात झालेला आहे. पावसाळ्याकरिता सुद्धा वांग्याची मल्चिंग पेपर वर बाग लावलेली आहे. कोरोनाचे संकट दूर होईल, या आशेने गत तीन महिन्यापासून प्रयत्न करूनही संकट टळेनासे झाल्याने भाव मिळेल की नाही, ही शंका मनाला त्रास देत आहे. बागायतीला अपेक्षित खर्च लागलेलाच आहे. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याला भाव नसल्याने कर्जाचे डोंगर मोठे होत आहे.-प्रशांत खागर, बागायतदार, पालांदूर.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती