शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भेंडीचे भरघोस उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.

ठळक मुद्देभाव मात्र अत्यल्प : लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम, भेंडी उत्पादकांना भाववाढीची आशा

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचा शेतकरी, बळीराजा स्वत: पिकवित इतरांना शुद्ध ताजा भाजीपाला पुरवीत आहे. मात्र कोरोणाच्या संकटात सदाबहार असलेला शेतकरी भाजीपाल्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने सुमार संकटात सापडला आहे. पडलेल्या भावाने विक्री खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी आज उद्या भाव वाढण्याच्या आशेने आपले बाग मात्र नुकसान सहन करीत सांभाळीत आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.जिल्ह्याच्या मंडीत नेण्याकरिता साधन अपुरी असून दराचा विचार करता परवडणारे नाही, त्यामुळे करावे काय या विवंचनेत स्थानिक ठिकाणीच गावोगावी सायकल, मोटारसायकल, हातठेले, डोक्यावरून माल वाहतूक करीत भाजीपाला विकणे सुरू आहे. भेंडीला सहा रुपये किलो असा दर मिळत असल्याने शेतकºयाला नुकसान सहन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. वांगे केवळ दोन रुपये ते चार रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.स्थानिकच्या मजुरांना हाताशी धरून लॉकडाऊनच्या संकटात उन्ह व पावसाची काळजी घेत अगदी पहाटेपासूनच शेतकरी मजुरांसोबत बांधावर हजेरी लावीत आहे. संकटात असलेल्या उत्पादकांना मदतीची अपेक्षा आहे.भेंडी पीक उत्पादनाला परवडणारे असून एक दिवस आड तोडा करावा लागत असतो. त्यामुळे भेंडीचे पीक परवडणारे आहे. मात्र भेंडीला किमान १० रुपयांच्यावर भाव असणे अपेक्षित आहे. प्रतिकिलो उत्पादन खर्च सात रुपये किलो एवढा अपेक्षित आहे. सव्वा एकरात भेंडीचे जोमदार पीक असून उत्पादनही एकदम चांगले आहे. पण कोरोनाच्या सावटात आठवडी बाजार बंद असल्याने भेडी विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.-घनश्याम भेदे, भेंडी उत्पादक, पालांदूर.दीड एकरात भेंडी व चवडी लागवड केली असून माल, भाजीपाला निघण्यास सुरुवात झालेला आहे. पावसाळ्याकरिता सुद्धा वांग्याची मल्चिंग पेपर वर बाग लावलेली आहे. कोरोनाचे संकट दूर होईल, या आशेने गत तीन महिन्यापासून प्रयत्न करूनही संकट टळेनासे झाल्याने भाव मिळेल की नाही, ही शंका मनाला त्रास देत आहे. बागायतीला अपेक्षित खर्च लागलेलाच आहे. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याला भाव नसल्याने कर्जाचे डोंगर मोठे होत आहे.-प्रशांत खागर, बागायतदार, पालांदूर.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती