शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मौल्यवान सागवन वृक्षांची खुलेआम तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:47 IST

तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्र चिखली येथील कक्ष क्रमांक ५९-१ मध्ये अज्ञात वनतस्करांनी किमान दीड घन मीटर असलेल्या उभ्या सागवन वृक्षांची कत्तल करून चारचाकी वाहतुकीने इमारत लाकूड लंपास केले.

ठळक मुद्देचारचाकीने वाहतूक : वन विभागाची यंत्रणा गाफील, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील प्रकार

आॅनलाईन लोकमतभंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्र चिखली येथील कक्ष क्रमांक ५९-१ मध्ये अज्ञात वनतस्करांनी किमान दीड घन मीटर असलेल्या उभ्या सागवन वृक्षांची कत्तल करून चारचाकी वाहतुकीने इमारत लाकूड लंपास केले. या वृक्षांची किंमत बाजार भावाप्रमाणे लाखोंच्या घरात आहे.मागील दोन वर्षात अनेक किरकोळ वनगुन्हे होत असल्यामुळे प्रतिबंधित कारवाई होत नसल्यामुळे एका युवकाने लेखी तक्रार वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना केली आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वन क्षेत्र हे दक्षिण दिशेला दीड कि़मी. नदी पात्रालगत आहे. या वनात सागवन, बिजा, हाळदू, तिवस अंजन, ऐन, किंजळचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या वनक्षेत्रात एकूण २० बिट असून ८५७५.५२२ हे.आर. सीमांकन बिटाचे क्षेत्र आहे. यात अस्थाई, स्थायी वनमजुरासमवेत, वनरक्षक, वनक्षेत्र सहायक यांचा शंभरी पार जत्था आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ असूनही वनतस्करींचा अवैध व्यवसाय सुरू आहे. मागील वर्षाच्या सत्रात लेंडेझरी वन परिक्षेत्राअंतर्गत वनमहोत्सव कालावधीत किमान दीड लाख रोपवन लोकसहभागातून लागवड केली आहे. त्यात सागवन, सिसम, बांबू, चिंच, आवळा, सिताफळ, करंज इत्यादी इमारत व फळझाडांची वृक्ष लागवड देवणारा, चिखली, रोंघा येथील वनकक्षात करण्यात आली. मात्र अल्प कालावधीतच संरक्षण व सर्वंधनाअभावी प्रचंड रोपांचे पतन झाले. मात्र संबंधित वनक्षेत्र सहायकांनी वार्षिक गोषवाºयात ७० टक्के ते ८० टक्के रोपवन जिवंत असल्याचा अहवाल सादर केला. लेंडेझरी वन परिक्षेत्र अधिकारी यांचा कार्यभार सैल व ढिसाळ असल्यामुळे वनरक्षक व वनमजुर वनांचे संरक्षण सर्वंधन न करता सर्रास कार्यक्षेत्रातील पानटपऱ्यावर आश्रय घेतात. वृक्षतोड झालेल्या वनकक्षात जाऊन मोबाईलद्वारे चित्रफीत तयार केली. संबंधित वरिष्ठ वनअधिकाऱ्याला तक्रारी मार्फत कक्ष क्रमांक ५९-१ मधील बिटाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.वनकर्मचाऱ्यांचे मुख्यालय निरंकभंडारा उपवन संरक्षक कार्यालयाकडून प्रतिवर्ष मुख्यालय देखभाल दुरूस्ती व नवीन इमारत बांधकामाकरिता लाखो रूपयांची आर्थिक तरतुद व राज्य शासन प्रचंड भांडवलाची गुंतवणूक वनाच्या संरक्षण व सर्वधनाच्या नावाखाली खर्च करीत आहेत. शासना अंतर्गत मुख्यालयी हजर राहण्याचे कडक निर्देश असूनही वनपरिक्षेत्रा समवेत कित्येक वनरक्षक, वनक्षेत्र सहायक, तालुका व जिल्हा वरून ये-जा करीत आहेत. त्यांच्या इमारती निरंक पडल्या आहेत रात्रपाळीत वनक्षेत्रात कसल्याही प्रकारे गस्त होत नसल्यामुळे वनतस्करांना संधीचे सोने ठरत आहे.