संवैधानिक अधिकारासाठी ओबीसी जनगणना आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:41+5:30
बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते. डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीसाठी असून या पिढीने ओबीसींच्या हक्क-आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होणे काळाची गरज झाली आहे.

संवैधानिक अधिकारासाठी ओबीसी जनगणना आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देशातील बहुसंख्येने असलेला मुळ निवासी समाज ओबीसी आहे. या समाजाची जनगणना साधन सामुग्रीच्या अभाव असताना इंग्रज काळात केली जावू शकते, तर आजच्या काळात सर्व साधने उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यासाठी देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंतच्या एकाही सरकारने न घेतलेला पुढाकार हा ओबीसीच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ओबीसींना संवैधानिक अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. जनगणना व्हावी, यासाठी शासनावर दबाव तंत्राचा वापर करण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी संघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.
तुमसर येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा येथे ओबीसी जनगणना परिषद भंडाराच्यावतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते.
डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीसाठी असून या पिढीने ओबीसींच्या हक्क-आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होणे काळाची गरज झाली आहे. ओबीसी आंदोलन हे सामाजिक चळवळ असून ओबीसींवर लादलेली असंवैधानिक क्रिमिलीअर अट सरकारने रद्द करायला हवी. सोबतच येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणाºया जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रखाना तयार करुन आमची संख्या मोजण्यात यावी, यासाठी आयोजित ४ जानेवारीच्या जिल्हास्तरीय मोर्च्यात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी सदानंद इलमे, खेमेंद्र कटरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन विश्वजीत फुंडे यांनी केले. बैठकीला गोपाल ठवकर, मोरेश्वर तिजारे, गजानन बुराडे, राजेंद्र कडव, श्रीधर उरकुडे, भजनदास बोळणे, अशोक ठाकरे, हैसोक शरणागत, रामलाल बोंदरे, मिलींद कापगते, लालचंद कटरे, चंद्रकुमार रहांगडाले, योगराज आंजनकर, सरीफ शेख, सुधाकर कहालकर, मनोज डोये, महेश गडेरिया, दामोदर डहाळे, कुवरलाल पटले, अभिमन्यू पटले, खेमराज नागफासे, चंद्रशेखर भोयर, जे. के. मने, पी.के.संग्रामे आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.