शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला. 

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी एकरी धान खरेदीच्या उद्दिष्टाबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आणि चार दिवसांपूर्वी सुरू झालेले उन्हाळी धान खरेदी केंद्र अचानक बंद झाले. धान खरेदीबाबतच्या निर्णयाने खरेदीदार संस्था व धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. खरेदीवरून जिल्ह्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे आता आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा विचारत आहे. जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा व संस्थाचालकांचा विरोध वाढीस लागल्याने आठ क्विंटल धान खरेदीची मर्यादा हटविण्यात आली. पूर्वीप्रमाणे धान खरेदीचे निर्देश परिपत्रकातून देण्यात आले. संस्थाचालकांनी मोठ्या थाटात धान खरेदीचा प्रारंभ केला. मात्र, चार दिवस उलटत नाही तोच धान खरेदीबाबतचे नवे निर्देश प्राप्त झाले. निर्देशानुसार ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल खरेदी करण्यास कळविण्यात आले. मात्र, प्रती एकर किती धान खरेदी करायचे, याचा अर्थबोध त्यातून होत नव्हता. परिणामी शेतकरी व संस्थाचालकांत गोंधळाची स्थिती आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी नोंदणीकृत ५९ हजार ६८५ शेतकऱ्यांकडून धान खरेदीचे निर्देश संस्थांना दिले आहेत. त्यानुसार प्रती शेतकरी ८.२५ क्विंटल खरेदी करावे, असा होतो. यामुळे दोन दिवसांतच धान खरेदी केंद्र बंद पडले आहे. 

धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज- जिल्ह्यात रब्बी हंगामात एकरी १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन होते; परंतु आठ क्विंटल धान विकल्यावर उरलेल्या धानाची विक्री कुठे करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा हमीभाव १९४० रुपये आहे; परंतु कोणताही खासगी व्यापारी हमीभावात धान घेणार नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात धानाची विक्री करावी लागेल. शेतकऱ्यांकडे धान साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती