शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला. 

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी एकरी धान खरेदीच्या उद्दिष्टाबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आणि चार दिवसांपूर्वी सुरू झालेले उन्हाळी धान खरेदी केंद्र अचानक बंद झाले. धान खरेदीबाबतच्या निर्णयाने खरेदीदार संस्था व धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. खरेदीवरून जिल्ह्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे आता आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा विचारत आहे. जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा व संस्थाचालकांचा विरोध वाढीस लागल्याने आठ क्विंटल धान खरेदीची मर्यादा हटविण्यात आली. पूर्वीप्रमाणे धान खरेदीचे निर्देश परिपत्रकातून देण्यात आले. संस्थाचालकांनी मोठ्या थाटात धान खरेदीचा प्रारंभ केला. मात्र, चार दिवस उलटत नाही तोच धान खरेदीबाबतचे नवे निर्देश प्राप्त झाले. निर्देशानुसार ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल खरेदी करण्यास कळविण्यात आले. मात्र, प्रती एकर किती धान खरेदी करायचे, याचा अर्थबोध त्यातून होत नव्हता. परिणामी शेतकरी व संस्थाचालकांत गोंधळाची स्थिती आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी नोंदणीकृत ५९ हजार ६८५ शेतकऱ्यांकडून धान खरेदीचे निर्देश संस्थांना दिले आहेत. त्यानुसार प्रती शेतकरी ८.२५ क्विंटल खरेदी करावे, असा होतो. यामुळे दोन दिवसांतच धान खरेदी केंद्र बंद पडले आहे. 

धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज- जिल्ह्यात रब्बी हंगामात एकरी १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन होते; परंतु आठ क्विंटल धान विकल्यावर उरलेल्या धानाची विक्री कुठे करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा हमीभाव १९४० रुपये आहे; परंतु कोणताही खासगी व्यापारी हमीभावात धान घेणार नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात धानाची विक्री करावी लागेल. शेतकऱ्यांकडे धान साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती