शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राज्यमार्ग नव्हे हे तर मृत्यूचे प्रवेशद्वारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात.

ठळक मुद्देरस्त्याची चाळण : भंडारा ते वरठी प्रवास नको रे बाबा, राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेच खड्डे

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराला रेल्वे मार्गाने जोडणारा १५ किलोमीटरचा भंडारा ते वरठी रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग नव्हे तर मृत्यूचे प्रवेशद्वार म्हणावे इतपत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून जाणारा प्रत्येक जण वरठी मार्गावर प्रवास नको रे बाबा असे म्हणत आहे.जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात. वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेल्या खड्ड्यातील दगड चाकांमधून उसळून दुसऱ्या वाहनचालकांना लागण्याच्या घटना घडत आहेत. लहान सहान अपघात तर नित्याचीच बाब आहे. गत आठवड्यात एका तरुणाला नाहक जीव या खड्ड्यांमुळे गमवावा लागला होता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.या मार्गावरून शेकडो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. रस्ता उखडलेला असला तरी रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टरही भरधाव धावताना दिसून येतात. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गत काही महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकाच्या अंगावर काटा उभा राहत असून अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत.महामार्गावर अनधिकृत पार्कींगराष्ट्रीय महामार्गावरील मुजबी फाटा आणि ठाणा, खरबी नाका या ठिकाणी वाहनांची अनधिकृत पार्कींग केली जाते. ट्रकच्या लांबच लांब रांगा येथे लागलेल्या असतात. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर खड्डेही पडले आहेत. त्यातच वाहने उभे राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. खरेदीदार रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा येथे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलीस शिपाई उपस्थित राहत असले तरी या वाहनचालकांवर मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही.

टॅग्स :highwayमहामार्गstate transportएसटी