शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

राज्यमार्ग नव्हे हे तर मृत्यूचे प्रवेशद्वारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात.

ठळक मुद्देरस्त्याची चाळण : भंडारा ते वरठी प्रवास नको रे बाबा, राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेच खड्डे

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराला रेल्वे मार्गाने जोडणारा १५ किलोमीटरचा भंडारा ते वरठी रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग नव्हे तर मृत्यूचे प्रवेशद्वार म्हणावे इतपत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून जाणारा प्रत्येक जण वरठी मार्गावर प्रवास नको रे बाबा असे म्हणत आहे.जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात. वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेल्या खड्ड्यातील दगड चाकांमधून उसळून दुसऱ्या वाहनचालकांना लागण्याच्या घटना घडत आहेत. लहान सहान अपघात तर नित्याचीच बाब आहे. गत आठवड्यात एका तरुणाला नाहक जीव या खड्ड्यांमुळे गमवावा लागला होता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.या मार्गावरून शेकडो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. रस्ता उखडलेला असला तरी रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टरही भरधाव धावताना दिसून येतात. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गत काही महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकाच्या अंगावर काटा उभा राहत असून अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत.महामार्गावर अनधिकृत पार्कींगराष्ट्रीय महामार्गावरील मुजबी फाटा आणि ठाणा, खरबी नाका या ठिकाणी वाहनांची अनधिकृत पार्कींग केली जाते. ट्रकच्या लांबच लांब रांगा येथे लागलेल्या असतात. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर खड्डेही पडले आहेत. त्यातच वाहने उभे राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. खरेदीदार रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा येथे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलीस शिपाई उपस्थित राहत असले तरी या वाहनचालकांवर मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही.

टॅग्स :highwayमहामार्गstate transportएसटी