शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाणीटंचाई निर्माण होऊ देणार नाही

By admin | Updated: April 14, 2016 00:52 IST

उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी

नाना पटोले : धरणाचे पाणी सोडण्याचे निर्देशलाखांदूर : उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे. गोसे धरण व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून दोन दिवसात पाणी मिळणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.तालुक्याला गोसे धरण तसेच इटियाडोह धरणाचे पाणी मिळते. दिवसेंदिवस चौरास भागात पाण्याची पातळी खोलीवर जात आहे. विहिरी कोरड्या, बोअर सुद्धा काम करेनासे झाले. उन्हाळी धान पिकाला पाणी न मिळाल्याने करपू लागले. यातच जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कुपनलिका, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने या सर्व योजना बंद पडल्या. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीपैकी केवळ ५७ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे हातपंप देखभाल दुरुस्ती करारनामा केला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६३ ग्रामपंचायतींनी विविध विकास कामे प्रस्तावित केली असली तरी ५० लक्ष रुपयाचा बृहद आराखडा तयार करण्यात आल्याचे आढावा बैठकीत माहिती देण्यात आली. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता आज खासदार नाना पटोले यांनी लाखांदूरला भेट दिली असता शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा लगेच गोसे धरण व इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे म्हणून सूचना केल्या. त्यामुळे दि. १५ एप्रिलपर्यंत पाणी पोहचेल म्हणून अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाल्यास पाण्याची पातळी नक्कीच वाढेल व पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. खा.नाना पटोले यांच्या प्रयत्नाने पाणी मिळणार असल्याचे नागरिक व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (तालुका प्रतिनिधी)