शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पावसाचा पत्ता नाही, टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:13 IST

जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाची नोंद निरंक : गतवर्षी १ ते १२ जूनपर्यंत १०१ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. जिल्ह्यात कुठेही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र लागून चार दिवस झाले आहे. अद्यापही मान्सूनच्या पावसाचे निश्चित नाही.भंडारा भात उत्पादक जिल्हा आहे. भातासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १२ जून या कालावधीत सरासरी ७८.२ टक्के पाऊस कोसळतो. मात्र यंदा १२ दिवसात एक थेंबही पाऊस कोसळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत सरासरी १०१.२ मिमी पाऊस झाला होता. पावसाचा थांगपत्ता नाही. दररोज तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. जिल्ह्यातील ६४९ गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता या गांवामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगेचे पात्रही कोरडे पडले आहे. नदीतिरावरील गावातील नळ योजना शेवटचा घटका मोजत आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना अत्यल्प तोकड्या ठरल्या. जिल्हा टँकरमुक्त असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले आहे. अनेक गावात खाजगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई भीषण होण्याची चिन्हे आहेत. आता सर्वांना पावसाचे वेध लागले असून कधी एकदा धो-धो पाऊस बसरतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.पऱ्हे टाकणे खोळंबलेभात पिकासाठी मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी आपल्या शेतात पºहे टाकतात. त्यानंतर पºहे मोठे झाले की त्याची रोवणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही कुठेच पाऊस पडला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकण्याचे काम खोळंबले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी पऱ्हे टाकले आहेत. मात्र प्रचंड तापमानामुळे पऱ्हे करपत असल्याचे दिसत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.असह्य उकाडाजिल्ह्यात तापमानाने यावर्षी उच्चांक गाठला. गत महिन्याभरापासून पारा ४५ अंशाचा वर आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. कुलर, पंखे आणि एसीही कुचकामी ठरत आहे. कुलरमधून गरम हवा येत आहे. घरात बसनेही असह्य झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण तापलेले असते. त्यातच विजेचा पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे असह्य उकाड्याने जीव कासावीस होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस