शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

पावसाचा पत्ता नाही, टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:13 IST

जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाची नोंद निरंक : गतवर्षी १ ते १२ जूनपर्यंत १०१ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. जिल्ह्यात कुठेही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र लागून चार दिवस झाले आहे. अद्यापही मान्सूनच्या पावसाचे निश्चित नाही.भंडारा भात उत्पादक जिल्हा आहे. भातासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १२ जून या कालावधीत सरासरी ७८.२ टक्के पाऊस कोसळतो. मात्र यंदा १२ दिवसात एक थेंबही पाऊस कोसळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत सरासरी १०१.२ मिमी पाऊस झाला होता. पावसाचा थांगपत्ता नाही. दररोज तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. जिल्ह्यातील ६४९ गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता या गांवामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगेचे पात्रही कोरडे पडले आहे. नदीतिरावरील गावातील नळ योजना शेवटचा घटका मोजत आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना अत्यल्प तोकड्या ठरल्या. जिल्हा टँकरमुक्त असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले आहे. अनेक गावात खाजगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई भीषण होण्याची चिन्हे आहेत. आता सर्वांना पावसाचे वेध लागले असून कधी एकदा धो-धो पाऊस बसरतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.पऱ्हे टाकणे खोळंबलेभात पिकासाठी मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी आपल्या शेतात पºहे टाकतात. त्यानंतर पºहे मोठे झाले की त्याची रोवणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही कुठेच पाऊस पडला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकण्याचे काम खोळंबले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी पऱ्हे टाकले आहेत. मात्र प्रचंड तापमानामुळे पऱ्हे करपत असल्याचे दिसत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.असह्य उकाडाजिल्ह्यात तापमानाने यावर्षी उच्चांक गाठला. गत महिन्याभरापासून पारा ४५ अंशाचा वर आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. कुलर, पंखे आणि एसीही कुचकामी ठरत आहे. कुलरमधून गरम हवा येत आहे. घरात बसनेही असह्य झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण तापलेले असते. त्यातच विजेचा पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे असह्य उकाड्याने जीव कासावीस होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस