शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

पावसाचा पत्ता नाही, टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:13 IST

जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाची नोंद निरंक : गतवर्षी १ ते १२ जूनपर्यंत १०१ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. जिल्ह्यात कुठेही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र लागून चार दिवस झाले आहे. अद्यापही मान्सूनच्या पावसाचे निश्चित नाही.भंडारा भात उत्पादक जिल्हा आहे. भातासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १२ जून या कालावधीत सरासरी ७८.२ टक्के पाऊस कोसळतो. मात्र यंदा १२ दिवसात एक थेंबही पाऊस कोसळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत सरासरी १०१.२ मिमी पाऊस झाला होता. पावसाचा थांगपत्ता नाही. दररोज तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. जिल्ह्यातील ६४९ गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता या गांवामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगेचे पात्रही कोरडे पडले आहे. नदीतिरावरील गावातील नळ योजना शेवटचा घटका मोजत आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना अत्यल्प तोकड्या ठरल्या. जिल्हा टँकरमुक्त असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले आहे. अनेक गावात खाजगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई भीषण होण्याची चिन्हे आहेत. आता सर्वांना पावसाचे वेध लागले असून कधी एकदा धो-धो पाऊस बसरतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.पऱ्हे टाकणे खोळंबलेभात पिकासाठी मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी आपल्या शेतात पºहे टाकतात. त्यानंतर पºहे मोठे झाले की त्याची रोवणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही कुठेच पाऊस पडला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकण्याचे काम खोळंबले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी पऱ्हे टाकले आहेत. मात्र प्रचंड तापमानामुळे पऱ्हे करपत असल्याचे दिसत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.असह्य उकाडाजिल्ह्यात तापमानाने यावर्षी उच्चांक गाठला. गत महिन्याभरापासून पारा ४५ अंशाचा वर आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. कुलर, पंखे आणि एसीही कुचकामी ठरत आहे. कुलरमधून गरम हवा येत आहे. घरात बसनेही असह्य झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण तापलेले असते. त्यातच विजेचा पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे असह्य उकाड्याने जीव कासावीस होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस