शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 6:00 AM

भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे.

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : तात्काळ सर्वेक्षण करून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभरातील शेकडो हेक्टरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. परिणामी आधीच सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर अस्मानी संकटही कोसळले आहेत. अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून बळीराजाला मदत देण्याची गरज आहे.भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे. विद्यमान स्थितीत काही शेतशिवारात बांध्यांमध्ये पाणी साचले असल्याने ते दृश्य पाहून शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशावेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातही असेच नुकसान झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे.याच बरोबर गाव तथा मुख्यालयाशी जोडणाऱ्या नाल्यांच्या पुलांची उंची वाढविण्याचीही गरज आहे. अतिवृष्टीमुळे भंडारा तालुक्यातील चांदोरी ते शिंगोरी मार्गावर असलेल्या पुलावर पाच दिवस पाणी असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागला.या गावांचा समावेशभंडारा तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या खैरी, कोथुर्णा, दाभा, टाकळी, माडगी, खमारी, सालेबर्डी, पिपरी, सुरेवाडा, करचखेडा, कारधा, सिरसघाट, कोरंभी, गणेशपूर, पिंडकेपार, टेकेपार, मौदी खास, जांब, ईटगाव, पागोरा आदी गावातील शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील गावाच्या वेशीवर असलेल्या नाल्यात जनावरेही वाहून गेली. अशामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची मागणी आहे. याशिवाय मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली, लाखनी येथेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती