शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्ष लोटूनही नुकसान भरपाई नाही; शेतकरी अर्धे उपाशी, अर्धे तुपाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:26 IST

तहसील कार्यालयात फेऱ्या : २०२२-२३ अवकाळीची आर्थिक मदत अडली

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी सन २०२२-२३च्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची केवायसी पूर्ण केली. केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भेदभाव पूर्ण आर्थिक मदत देण्यात आली आहे. यात अर्धे शेतकरी तुपाशी आणि अर्धे शेतकरी उपाशी, असे चित्र आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांचे बचत खात्यात नुकसानभरपाई देण्यात आली आहे. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांच्या फेऱ्या तहसील कार्यालयात वाढलेल्या आहेत.

२०२२-२३ कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तलाठ्यांनी केल्यानंतर शासनस्तरावरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांचे केवायसी करण्यासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यादीत नावे असल्याने शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे. दरम्यान, केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्यात जानेवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात आर्थिक मदत देण्यात आली आहे. परंतु सोबतच केवायसी पूर्ण केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचे बचत खात्यात फेब्रुवारीतही आर्थिक मदत देण्यात आली नाही. अल्प नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जलद गतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. परंतु सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठेंगाच दाखविण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. मदतीसंदर्भात कर्मचाऱ्याकडून टोलवाटोलवी केली जाते. 

पुराच्या याद्या खोळंबल्यासन २०२४ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यांत तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या धान पिकात शिरले होते. धान पिकांचे नुकसान झाले. तलाठ्यांनी पंचनामे केले. याद्या महसूल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. परंतु याद्या परत केवायसी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना केवायसीसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने मदतीची अपेक्षा करणे गैर आहे. यामुळे तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी आहे.

पीक कर्जाचे टेन्शनमार्चअखेरीस पीक कर्ज भरण्याचे टेन्शन शेतकऱ्यांना आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. पुन्हा उन्हाळी धान पिकांचे ओझे आले. खर्च वाढले. महिनाभरानंतर पीक कर्ज भरण्याचे टेन्शन वाढणार आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, नुकसानभरपाई मिळाली नाही. शासनाने हातच ओढले असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत फेब्रुवारी महिन्यात देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbhandara-acभंडारा