शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 15:25 IST

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही.

ठळक मुद्देबांबूचा पुरवठा करा, हमी भावाने खरेदी व पेंशनची मागणी

युवराज गोमासे

भंडारा : आगरात बांबू नाही, बाहेरून खरेदी करताना दुप्पट भाव. प्लास्टिकच्या वस्तूच्या अधिक वापराने बांबूच्या वस्तूंना ग्राहकच मिळेना. कोरोनातून सावरत नाही तोच महागाईचा फटका, आता आम्ही पोट तरी कसे भरावे, ना इलाजाने रोजगार हमीच्या कामावर जाण्याची वेळी आली, अशी व्यथा मोहाडी तालुक्यातील पालोराचे बांबू कारागीर सांगत होते. ही अवस्था एकट्या पालोराचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची आहे.

वनविभागाच्या आगारातून हमी भावाने कारागीर बांबूची खरेदी करतात. त्यापासून टोपले, सुप, पड्डे, ताटवे, चटई, ढोली, मासेमारीसाठी ढुटी, पंखे यासह विविध वस्तू तयार केल्या जातात. आगरातून कार्डधारक व्यावसायिकांना २० ते २२ फूट लांबीचा बांबू २५ ते ३० रुपयांच्या हमी भावात मिळायचा. मात्र ३० जून २०२१ पासून तुमसर वन विभागाच्या पालोरा आगरात बांबू नाही. कार्डधारकांकडून वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. कोरोना काळापासून बांबू व्यवसाय कमालीचा रोडावला. कोरोना काळात आठवडी बाजार बंदचाही फटका बसला. त्यातच घराघरात प्लास्टिक वस्तूंचा वापर वाढीस लागल्याने व्यवसाय कमालीचा अडचणीत सापडला आहे. वस्तू विकल्या जात नाही. खर्चाधारित भावही मिळत नाही. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही. आठवडी बाजार, शेजारील गावात फेरी मारून ५० ते ३०० रुपयांपर्यंत वस्तूंना भाव मिळतो. पोट भरण्यापुरताही पैसा उपलब्ध होत नाही. त्यातच कीड व अधिक खडे असलेला व निस्तार बांबूमुळे नुकसान अधिक असते, अशी कैफियत बांबू कारागिरांनी मांडली.

जिल्ह्यात बांबू व्यवसायातील गावे

जिल्ह्यात भंडारा, मेंढा, अडयाळ, पालोरा, लाखनी, साकोली, बारव्हा, मुंढरी, माटोरा, सुकळी, मानगाव आदी गावात हा व्यवसाय केला जातो. ठेकेदाराच्या माध्यमातून वरठी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात मालाचा पुरवठा केला जातो.

कार्डधारक बांबू कारागिरांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे विडी कारागिरांप्रमाणे पेंशनचा लाभ देण्यात यावा, औषधोपचारासाठी मोफत सुविधा मिळावी, कोरोना काळातील नुकसान भरपाई देण्यात यावी.

- हरिश्चंद्र कोडापे, बांबू कारागीर पालोरा.

पालाेरा येथील बांबू आगरात वेळेत व हमी भावात वनविभागाने बांबू उपलब्ध करून द्यावा, हस्तकलेच्या वस्तुंची शासनाने हमी भावा खरेदी केल्यास फायदा होईल.

- बाबुलाल कोडापे, बांबू कारागिर पालोरा.

टॅग्स :Socialसामाजिकbhandara-acभंडाराVidarbhaविदर्भ