नवीन केंद्राचे प्रस्ताव धूृळ खात
By Admin | Updated: July 12, 2014 23:32 IST2014-07-12T23:32:36+5:302014-07-12T23:32:36+5:30
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासन स्तरावर शालेय विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी जबाबदारी कमीत कमी १८ शाळामागे असलेल्या केंद्राकडे सोपविण्यात

नवीन केंद्राचे प्रस्ताव धूृळ खात
सहा केंद्रांचा समावेश : शैक्षणिक नियोजनात तालुका मागे
साकोली : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासन स्तरावर शालेय विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी जबाबदारी कमीत कमी १८ शाळामागे असलेल्या केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. परंतु शाळांच्या संख्येत केंद्राची संख्या कमी असून नवीन केंद्राचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडले आहेत.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत शाळांना साहित्य पुरवठ्याचे काम केले जाते. परंतु ही जबाबदारी असलेल्या नव्या केंद्राच्या निर्मिती संबंधाने शासकीय यंत्रणा उदासीनता दाखवीत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केंद्रातील केंद्राधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शाळांच्या तुुलनेत केंद्राची संख्या कमी असल्याने शासनाचे धोरण कुचकामी ठरण्याच्या मार्गावर आहे.
केंद्र प्रमुखाला विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे शैक्षणिक नियोजन आणि त्यांची पाहणी करणे अशी प्रमुख जबाबदारी असते. एका केंंद्रात कमीत कमी १८ शाळांचा समावेश असावा असे शासकीय धोरण आहे. ज्यामुळे केंद्र प्रमुखांना अधिकाधिक लक्ष पुरवून योग्यवेळी सहजपणे आपली जबाबदारी पार पाडणे शक्य होईल.
साकोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत सहा केंद्रांचा समावेश आहे. यात साकोली, सानगडी, कुंभली, विर्शी, पिंडकेपार व एकोडी या केंद्राचा समावेश आहे. साकोली केंद्रांतर्गत ५० शाळा, सानगडी २९ शाळा, कुंभली २८ शाळा, विर्शी २० शाळा, पिंडकेपार १८ शाळा आणि एकोडी केंद्रांतर्गत २२ शाळांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत शाळांची आकडेमोड केल्यास ५९ शाळांची संख्या केंद्रापेक्षा अतिरिक्त आहे.